सकाळी उठल्यावर पाणी पिण्याबद्दल अनेक मान्यता आणि उत्तरं सांगितली जातात. अनेकांचं म्हणणं आहे की सकाळी उठल्यावर दात न घासता पाणी प्यायलं चांगलं तर अनेक लोक म्हणतात की हे अयोग्य आहे. मग आता बरोबर काय? किंवा मग सायन्स काय सांगतं?
आपल्या दैनंदिन जीवनासंबंधीत माणसांना असे काही प्रश्न पडतात की बऱ्याचदा त्यांची अचूक उत्तर सापडणं फारच कठीण असतं. शिवाय आपण दिवसभरात ओघा-ओघात किंवा नकळत अशा काही गोष्टी करत असतो की त्यापैकी काय चूक आणि काय बरोबर यामधला फरक आपण विसरुन जातो.
तज्ज्ञांच्या मते आपली लाळ म्हणजे पाचकरस आहे. रात्रभर तोंडात असलेली लाळ मुंगी किंवा एखाद्या किड्यावर टाकून बघा. ते त्वरीत मरतात. इतकी ती लाळ प्रभावी असते. तीच लाळ शरीरावरील जखमेवर लावल्यास जखम देखील बरी व्हायला मदत होते.
त्यामुळे सकाळी उठल्याबरोबर अनशापोटी, ब्रश न करता, तोंड न धुता जर आपण प्यायलो तर आपल्या तोंडातील रात्रभरात साचलेली लाळ देखील पोटात जाते आणि त्याचे खूप फायदे आपल्या शरीराला होतात.
याचे फायदे काय…?
१ अन्ननलिका साफ होते.
२ यामुळे लगेच संडासला होते, ज्यामुळे पोट साफ राहाण्याची समस्या सुटते.
३ बद्धकोष्ठता दूर होते.
४ प्रतिकारशक्ती अधिक मजबूत होते. सामान्य खोकला, सर्दी,फ्लू किंवा ताप यासारख्या आजारांना कमी वेळा बळी पडता
५ रक्तदाब कमी होतो आणि दिवसभर रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहते.
६ जेव्हा दिवसाची सुरुवात एका ग्लास पाण्याने करता तेव्हा खात्री करता की गॅस्ट्र्रिटिस किंवा अपचन सारख्या समस्या तुम्हाला त्रास देणार नाहीत.
७. हे तुमची त्वचा आणि केस दोन्ही मऊ आणि चांगले ठेवण्यात मदत करते…
पण पुढे तज्ज्ञ असं देखील म्हणतात की, यासाठी तुम्हाला रात्री ब्रश करुन झोपने गरजेचे आहे. जर तुम्ही ब्रश करुन त्यावर काहीही न खाता झोपत असाल, तर ही लाळ तुमच्या शरीरासाठी चांगली आहे.