अमिताभ बच्चन एक जिद्दी अभिनेता
जिंदगी में कभी उदास ना होना
कभी किसी बात पर निराश ना होना
ये जिंदगी एक संघर्ष है चलती रहेगी
कभी अपने जीने का अंदाज ना खोना।

www.janvicharnews.com
१९६५-६६ च्या वर्षातली घटना आहे. ऑल इंडिया रेडिओच्या कार्यालयात वृत्तनिवेदक पदासाठीच्या मुलाखती सुरु होत्या. तत्कालीन काळात रेडिओ म्हणजे प्रचार प्रसाराचे माध्यम आणि म्हणूनच रेडिओतल्या ह्या प्रतिष्ठित नोकरीसाठी अनेकांनी गर्दी केली. बीएस्सीचे शिक्षण पूर्ण करणार असाच एक तरुण मुलाखतीसाठी दाखल झाला. ह्या तरुणाच्या आवाजाची टेस्ट घेण्यात आली आणि ” तुमचा आवाज रेडिओसाठी अजिबात सुट होत नाही” असे म्हणत ह्या तरुणाला रेडिओवाल्यांनी जवळ जवळ हाकलूनच लावले. निराश मनाने पायऱ्या उतरणाऱ्या ह्या तरुणाला कळेना की आपल्या खराब आवाजाचा दोष द्यायचा कुणाला धडपड मात्र थांबली नाही. आपला आवाज चांगला नसेलही पण चेहरा मात्र चांगला आहे . मग दुसरा प्रयत्न करून पाहावा असा विचार करत ह्या तरुणाने” युनायटेड फ्लिमओयर टॅलेंट ” स्पर्धेत सहभाग घेतला. चित्रपट क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा बाळगणारे अनेक जण ह्या स्पर्धेत सहभागी होत. या तरुणाने सुध्दा खास रशियन कॅमेऱ्याने काढलेले फोटो स्पर्धेसाठी पाठवले. परंतु सध्या प्राथमिक फेरीत सुध्दा त्याला प्रवेश मिळाला नाही. निराशेच्या गर्तेत अडकलेल्या ह्या हतबल युवकाला काय करावे हेच कळेना पण एक गोष्ट मात्र डोक्यात होती. ” कुठल्याही परिस्थितीत माघार घ्यायची नाही. कारण पुढे चालणाऱ्यासाठी वाट तरी असते. माघार घेणाऱ्यांना ती सुध्दा कुणी सांगत नाही “, आणि डोक्यातला तोच विचार काळजावर कोरत ह्या माणसाची वाटचाल सुरु झाली. ही वादळी वाटचाल इतकी अजरामर ठरली की सगळ्या जगाने ह्या माणसाला सलाम ठोकला .
२००३ साली तर फ्रान्स सरकारने आपल्या ड्युनले शहराचे नागरीकत्व ह्या माणसाला बहाल केले. आतापर्यंत हा सन्मान फक्त ब्रिटनची महाराणी एलिझाबेथ व्दितीय आणि ख्रिश्चन धर्माचे सर्वोच्च धर्मगुरु पोपजॉन पॉल यांना मिळाला होता. तुम्ही यशस्वी होऊच शकत नाही, असे जग म्हणत असतांना हा माणूस सहस्त्रकातला महान अभिनेता ठरला. तो सिकंदर अवलिया म्हणजे अमिताभ ! अमिताभचे वडील हरिवंशराय बच्चन हे हिंदीतले प्रसिध्द कवी म्हणून ओळखले जात. त्यांच्या पहिल्या पत्नीचा शामादेवींचा आतड्यांच्या आजाराने दुर्दैवी मृत्यू झाला. एकाकी झालेले हरिवंशराय यांनी तेजसुरी नावाच्या पंजाबी मुलीशी दुसरे लग्न केले. पण जातीबाहेरच्या मुलीशी लग्न केल्याचे कारण देत सगळ्या नातेवाईकांनी हरिवंशराय यांच्यावर बहिष्कार घातला तर ह्या बंडखोर कवीने ज्या ” श्रीवास्तव ” आडनावामुळे माझी जात समजते, तेच सोडण्याचे जाहीर केले आणि ” बच्चन ” ह्या टोपण नावाने लिखाण सुरु केले. भविष्यात तो सगळा परिवारच ‘ बच्चन ‘ झाला आणि ह्याच हरिवंशराय आणि तेजसुरीच्या पोटी ‘ अमिताभ ‘ चा जन्म झाला. कलकत्त्यातल्या बड्या कंपनीतली १६०० रुपये पगाराची नोकरी सोडून १९६९ साली अमिताभ चित्रपटात काम करण्याकरता मुंबईत दाखल झाला. परंतु या माणसाबाबतच्या सिनेसृष्टीच्या प्रतिक्रिया मोठ्या भयानक होत्या. ” हा घोड्यासारख्या तोंडाचा तरुण मोठा विचित्र आहे ” म्हणत एका समीक्षकाने त्याला खडसावले तर एका पत्रकाराने सल्लाच दिला की ” तुमचे पाय खूप लांब आहेत , तुम्ही चित्रपटात येण्यापेक्षा फुटबॉल खेळा ” रेडिओवाल्यांनी तर आधीच नाकारले होते . हसावे की रडावे हेच अमिताभला कळेना. पण ध्येय निश्चित असल्याने ह्या जिद्दी माणसाने रस्ता सोडला नाही. अमिताभचा मुंबईतला आरंभीचा काळ मोठा खडतर ठरला.
ड्रायव्हिंग लायसन्स सोडले तर खिशात काहीच नसायचे. मरिन ड्राईव्ह वर बसून विचार करण्यातच दिवस जायचा आणि अशातच मित्र परिवाराच्या ओळखीतून ” सात हिंदुस्थानी ” नावाच्या चित्रपटात एक छोटीशी भूमिका मिळाली परंतु हा चित्रपट सपशेल आपटला. लांब टांगांचा कुणीतरी नट चित्रपटात आहे एवढी ओळख फक्त अमिताभला मिळाली. ” रेश्मा आणि शेरा ” नावाचा दुसरा चित्रपटही मिळाला. भुमिका आणि संवाद ही दिग्दर्शकाने दिले पण प्रत्यक्षात जेव्हा अमिताभचे संवाद जिभेवरच राहिले. परंतु डोळ्यातले अश्रू मात्र कमी होईनात. सर्वांनी नाकारलेला अमिताभचा आवाज आज भारताची ओळख झालाय.
लंडन येथील जगप्रसिध्द मादाम तुसा बॅक्स म्युझियममध्ये मेणाचा पुतळा बसवण्यासाठी निवडलेला करमणूक जगातला हा पहिला भारतीय एकेकाळी यशासाठी तरसला होता. अखेर प्रकाश मेहराचा ” जंजीर ” प्रदर्शित झाला आणि ” अँग्री यंग मॅन ” अमिताभ जगासमोर आला. धर्मेंद्रला डोळ्यासमोर ठेवत बनवलेला हा चित्रपट होता. परंतु धर्मेंद्रने तो नाकारला शेवटी देव आनंद, राजकुमार यांचा नकार स्विकारत अमिताभच्या वाट्याला तो आला आणि त्याने त्याचे अक्षरश : सोनेच केले. जंजीरनंतर अमिताभने मागे वळून पहिलंच नाही. दिलीपकुमार , राजेश खन्ना, देव आनंद यांच्या चाकोरीबध्द अभिनयामुळे निर्माण झालेल्या पोकळीतून हा सुपरस्टार जन्माला आला होता. कर्तृत्वशून्य माणसांच्या लेखी संधीची किंमत मातीसारखीच असते. या उलट कर्तृत्ववान व्यक्ती मात्र संधीच्याच शोधात असतात. जंजीरने ती संधी अमिताभला मिळवून दिली आणि पाहता पाहता लावारिस , नमकहराम , कालिया , शराबी , अमर अकबर अँथनी , दिवार , कुली , अग्निपथ अशा अमिताभयुगाचा प्रारंभच झाला. अमिताभचा चित्रपट फ्लॉप जरी झाला तरी प्रचंड नफा राहतो, हे लक्षात आल्यावर तर निर्मात्यांची रांगच लागली आणि मुंबईत पावाच्या तुकडयाला तरसणारा हा पोर त्याच शहरात सुपरस्टार पदावर जाऊन धडकला.

www.janvicharnews.com
अमिताभ बच्चन ह्या नावाचा इतिहास आगळावेगळा आहे . Sorry you don’t sell म्हणून अनेक जण नाकरत असतांना त्याने खुदा गवाह नावाचा चित्रपट स्वीकारला. अफगाण मधल्या प्रदेशात चित्रित झालेली ही फिल्म अफगाणिस्तानातही आजपर्यंतची सर्वात हिट फिल्म म्हणून ओळखली जाते. या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या वेळी अफगाणमधील जवळपास अर्धी सुरक्षा यंत्रणा वापरावी लागली हा सुध्दा एक विक्रमच होता. २४ जुलै १९८२ रोजी मात्र अमिताभला स्वतःची किंमत उमजली. अमिताभच्या कुली चित्रपटाचे बंगळूरमध्ये शुटिंग सुरु होते.. सहकलाकार पुनीत इस्सारसोबत एका दृष्यात अमिताभला हाणामारी करायची होती आणि हाणामारी करतांना अचानक अमिताभ समोरच्या टेबलावर आदळला. टेबलाचा तुकडा पोटात घुसून गंभीर जखम झाली. ही जखम इतकी गंभीर होती की बंगळूरहून तातडीने त्याला विमानाने मुंबई आणण्यात आले. उपचार सुरु झाले पण डॉक्टरांनी मात्र पेशंटच्या जगण्याची आशा सोडून दिली होती. प्रत्येक भारतीयाच्या डोळ्यात अमिताभसाठी अश्रू होते. कुणी मंदिरात तर कुणी मशिदीत प्रार्थना करू लागले. हजारोंनी ब्रिच कॅन्डी बाहेर रक्तदानासाठी रांगा लावल्या, शेकडो कलाकार रोज हॉस्पिटलच्या चकरा मारत. प्रधानमंत्री इंदिरा गांधींनी स्वतः हॉस्पिटलला भेट देऊन उपचारांची माहिती घेतली. तब्बल दोन आठवडे ब्रिच कॅन्डीला जत्रेचे स्वरूप आले होते. बिचाऱ्या पुनीत इस्सारचे मात्र अमिताभच्या चाहत्यांनी घराबाहेर पडणे मुश्किल करून टाकले. ह्या जिद्दी माणसाने आजारावरही मात केली. अमिताभ जेव्हा आजारातून बरा होऊन निघाला तेव्हा कुठे सर्वांच्या जीवात जीव आला. बॉलीवूडच्या दृष्टीने तर अमिताभचा पुनर्जन्मच होता. तर लंडनहून खास शस्त्रक्रियेसाठी आलेले डॉक्टर मात्र ह्या माणसाच्या इच्छाशक्तीचे कौतुक करीत होते. तब्बल वीस वर्षे अमिताभ सुपरस्टार पदावर होता. परंतु १९९५ नंतर मात्र परिस्थिती वेगाने बदलू लागली. अनेक नवीन स्टार बॉलीवूड जागवू लागले . एकाच मांडणीचे चित्रपट कणाऱ्या अमिताभच्या यशाचा आलेख वेगाने कोसळत होता. गिरफ्तार, महान, आखरी रास्ता, मृत्युदाता, दो अनजाने असे सारे चित्रपट ओळीने फ्लॉप ठरू लागले, कुठलेही काम जिंकण्यासाठी किंवा हरण्यासाठी अमिताभ अयशस्वी ठरत होता. त्यातच अमिताभ बच्चन कॉर्पोरेशन लिमिटेड नावाची कंपनी त्याने सुरु केली. अमिताभचे चित्रपट मॉडेलिंग, मुलाखती हे सगळे ह्या कंपनीकडे आले. जिये चित्रपटच चालत नाही तिथे कंपनी काय करणार? प्रचंड गुंतवणुक केलेली ‘ ABCL ‘ चा डोलारा अवघ्या तीन वर्षातच कोसळला आणि अमिताभ कर्जाच्या विळख्यात अडकला. त्याच्या जुहूच्या बंगल्यावर जप्ती आली. त्यातच बोफोर्स सारख्या राजकीय खटल्यात नाव आल्याने अमिताभची लोकप्रियता अक्षरश : रसातळाला पोहचली . एक वेळ तर अशी आली की अमिताभचा ” आज का अर्जुन ” हा चित्रपटच कुण्या वितरकाने घेतला नाही आणि बॉलीवूड म्हणजे चलत्या नाण्याची दुनिया ज्याचे चित्रपट चालत नाहीत त्यांना काम देणार कोण? अमिताभची अवस्था देखील तशीच झाली. बॉलीवूडचा हा शहेनशहा काम मिळावे म्हणून तरसला होता. अमिताभ युग संपले अशी हाकाटी सुरु असतांना अमिताभने मात्र एक धाडशी निर्णय घेतला. मोठ्या पडद्यावर काम मिळत नसले म्हणून काय झाले. आपण छोट्या पडद्यावर काम करू म्हणत ह्या माणसाने कौन बनेगा करोडपती, हा कार्यक्रम स्वीकारला. अमिताभच्या दमदार आवाजात कौन बनेगा करोडपतीचे काम सुरु झाले आणि जगभरातले करोडो लोक हा कार्यक्रम पाहू लागले. एरवी पडद्यावर दिसणारा अमिताभ टीव्हीवर झळकू लागला. हा कार्यक्रम इतका यशस्वी झाला की टेलिव्हिजन क्षेत्रातला सर्वाधिक लोकप्रिय व उत्पन्न मिळवून देणारा कार्यक्रम म्हणून याची नोंद झाली. रसातळाला गेलेली अमिताभची कारकीर्द कौन बनेगा करोडोपतींने उचलून धरली आणि हा मुकदर का सिकंदर पुन्हा यशोशिखरावर जाऊन पोहचला.
अमिताभ संपला म्हणणारे निर्मात दिग्दर्शक पुन्हा त्याच्या मागे पुढे घिरट्या घालू लागले. ” लार्जर दॅन लाईफ ” असणाऱ्या ह्या माणसाची घोडदौड पुन्हा सुरू झाली. राखेतून झेप घेणारा फिनिक्स पक्षीही जरी काल्पनिक संकल्पना असली तरी जिद्दीने काम केल्यास ती देखील वास्तवात उतरु शकते हेच ह्या महानायकाने दाखवून दिले. इतर अभिनेत्यांच्या तुलनेत अमिताभचे कौटुंबिक आयुष्य मात्र निकोप राहिले. पुत्र अभिषेकने वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत सिनेसृष्टीत प्रवेश घेतला. तर मुलगी श्वेता राज कपूरच्या नातवाशी विवाहबध्द झाली. बडे नट , राजकारणी यांची मुले मुजोर आणि स्वर असतात परंतु अभिषेक श्वेताच्या बाबतीत असे काहीच घडले नाही. कदाचित आई- वडिलांच्या संस्कारांचा तो परिणाम असावा. परंतु रेखा नावाचे पात्र अमिताभबाबत जनसामाण्यांची उत्सुकता मात्र वाढवत राहिले. एके काळच्या सावळ्या रेखाला अमिताभने घडवले तिचे वैचारिक परिवर्तन आणि कलात्मक विकास घडवून आणला. पण त्यांचे नातेमात्र विवादितच राहिले. रेखाच्या घरात तुझे पोट्रेट आहे म्हणजे तुमच्यात काही होतं असे एका पत्रकाराने विचारताच अडकलेला अमिताभ कडाडला. हजारो लोकांच्या घरात माझे फोटो आहेत. मग या सर्वांशी माझे अफेअर आहे का ? अमिताभचे उत्तर योग्य असले तरी मै जिंदगी मे तुझे पा नहीं सकती और जिते जी खो नही सकती , म्हणत मुकद्दर का सिकंदर मधल्या रेखाने मात्र कधीच उत्तर दिले नाही. उद्योगजगतापासून तर राजकारणापर्यंत धडक मारणारा अमिताभ आज एक आख्यायिका बनून राहिलाय. ह्या माणसाच्या आयुष्यात शिकण्यासारखे खूप काही आहे . मुंबईतल्या स्टुडिओत मान खाली घालुन शिरणाऱ्या अमिताभला कधी बिस्किट खाऊन तर कधी उपाशी राहावे लागले पण जिद्दीच्या जोरावर एक वेळ अशी आली की , BBC ने स्टार ऑफ द मिलेनियम म्हणून अमिताभला सन्मानित केले. त्यावेळी पाली चैंपलीन व लॉरेन्स ऑलिव्हिए ह्या जगप्रसिध्द अभिनेत्यांच्या लोकप्रियतेवर त्याने मात केली होती. सर्वात धक्कादायक बाब ही की त्याच्या सत्तरीत सुध्दा सुपरस्टार असणारा अमिताभला लाखात एखाद्याला होणारा “ मायस्थेनिस ग्रेविस ” नावाचा आजार आहे. औषधे घेतल्याशिवाय साधा भांग पाडायला सुध्दा हात हालवू शकत नाही , असे ह्या आजाराचे स्वरूप आहे. अशावेळी कजरा रे कजरा रे म्हणत नाचणारा अमिताभ किती जिद्दी असावा याची शहेनशहा शेवटी शहेनशहाच असतो.. !!! खात्री पटते . सर्वसामान्यांच्या मते तर त्याने असेच जिद्दी असावे कारण
शहेनशहा शेवटी शहेनशहाच असतो…!!!

www.janvicharnews.com
12 डायलॉग्स ज्यांनी अमिताभ यांना बॉलिवूडचा शहेनशाह बनवले
‘आज मेरे पास गाड़ी है, बांग्ला है, पैसा है… तुम्हारे पास क्या है?’ मेरे पास मेरी मां है
डॉन को पकड़ना मुश्किल ही नहीं, नामुमकिन है!
आनंद मरा नहीं… आनंद मरता नहीं…
यह तुम जानती हो कि यह रिवाल्वर खाली है… मैं जानता हूं कि यह रिवाल्वर खाली है… लेकिन पुलिस नहीं जानती कि यह रिवाल्वर खाली है
मैं और मेरी तनहाई अक्सर ये बातें करते हैं तुम होती तो कैसा होता तुम या कहती तुम वह कहती तुम होती बात प्रति बालों वाली होती तुम इस बात पर कितने हंसती तुम होती तो ऐसा होता तुम होती से वैसा होता मैं और मेरी तनहाई अक्सर यह बातें करते हैं
मैं आज भी फेंके हुए पैसे नहीं उठाता
हम जहां खड़े होते हैं लाइन वहीं से शुरू होती हो..
पैसा क्या है, सिर्फ एक नंबर ना।
जिस तरह गोभी का फूल, फूल होकर फूल नहीं होता, वैसा ही पाने का फूल भी फूल होता है फूल नहीं होता
इस दुनिया में दो तरह का कीड़ा होता है। एक वो जो कचरे से उठता है। और दूसरा वो जो पाप की गंदेगी से उठा है।
मैं अंग्रेजी बोल सकता हूं, मैं अंग्रेजी चल सकता हूं, मैं अंग्रेजी हंस सकता हूं क्योंकि अंग्रेजी बहुत ही फनी भाषा है। भैरो बायरन बन जाते हैं क्योंकि उनका दिमाग बहुत संकीर्ण है!