
www.janvicharnews.com
नवी दिल्ली | भारतीय रिझर्व्ह बॅंकेने(RBI) एक मोठा निर्णय घेतला आहे. आरबीआयने रेपो दरात(Repo Rate) वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. आरबीयाच्या पतधोरण आढावा बैठकीत 50 बेसिस पाॅंईंटची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. ही व्याजदार दरवाढ तात्काळ प्रभावाने लागू होणार असल्याचे आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी सांगितले आहे.

www.janvicharnews.com
आरबीआयच्या या निर्णयामुळे रेपो दर 5.40 टक्क्यांवर गेला आहे. रेपो दरात वाढ झाल्याने आता कर्ज महागणार आहे. त्यामुळे शैक्षणिक, वैयक्तिक, गृह, कार कर्ज महागणार आहे. आता आधीच्या महागाईला तोंड देत असताना सामान्यांची आणखी चिंता वाढण्याची शक्यता आहे.
www.janvicharnews.com
आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास (Shaktikanta Das) यांनी एक पत्रकार परिषद घेतली. त्यामध्ये त्यांनी महत्वाची माहिती सांगितली आहे. 2022-23 मध्ये भारताचा जीडीपी(GDP) 7.2 टक्के राहण्याचा अंदाज आहे. तसेच सध्या जागतिकीकरण आणि जागतिक अर्थव्यवस्थेवर(Economy) दबाव दिसून येत आहे. त्याचा परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवर होत आहे. देशात महागाईची चिंता कायम असल्याचेही दास यांनी सांगितले आहे. मान्सून सामान्य राहिल्यास आणि कच्च्या तेलाच्या किंमती 105 डाॅलर प्रति बॅरल राहिल्यास, चालू आर्थिक वर्षात महागाई दर 6.7 टक्के राहण्याचा अंदाज असल्याचंही दास यांनी यावेळी सांगितलं आहे.

www.janvicharnews.com
दरम्यान, रेपो रेट म्हणजे ज्या दराने बॅंका आरबीआयकडून पैसे घेतात तो दर. म्हणजेच जर आरबीआयने रेपो रेट वाढवला तर बॅंका देखील ग्राहकांच्या कर्ज दरात वाढ करतात. त्यामुळे आता आरबीआयने रेपो दरात वाढ केल्याने सर्वांना कर्ज घेताना कर्ज दर वाढणार आहे.