…. उध्दव ठाकरे यांचं खरचं चुकलं कुठे ह्या प्रश्नाचं उत्तर लवकर दिलं असत पण जरा संयम मी बाळगला . कारण घाईगडबडीने केलेला विचार चुकू शकतो पण संयमी केलेला विचार चुकत नाही .

www.janvicharnews.com
लक्ष्मणा पेक्षा मला प्रभू श्री राम मला जास्त आवडतात कारण ते संयमी होते 🚩
आता चुकलं कुठे बघू च …
हिदूहृदय बाळासाहेब ठाकरे यांच्या घरी जन्म घेतला इथे त्याच चुकलं .
लोकांना काय चुका काढायच्या म्हंटल्यावर ते कसे करून चुका काढतील .
दुसर म्हणजे त्याच्या घरात घडलेले समाजाच राजकारण त्याच्या मनावर पडलेले विचार त्यांनी ते ध्यानात घेतले ते तरी त्याचं चुकलं च .
फोटोग्राफी सोडून राजकारणात हाथ घातला संमाजा साठी ते पण चुकलं च .
लोकांच्या डोळ्यात खुपणारा मिळालेला राजकीय वारसा भेटला हे पण चुकलं च .
अंगात असलेला संयमी व शांतता ती पण चुकल च .
लोक मानस माणसात फरक करतात त्यांनी मराठी माणसाला एक करून सरकार उभारल ते चुकलंच .
आरामशीर वारसा हक्काने भेटलेले पद घेऊन मज्जा मारायची सोडून मुख्यमंत्री पदाची जबाबदारी घेतली .
कोणाच्या सारख्या टोप्या फेटे घालून हिंदुत्व नाही दाखवलं हे पण चुकलंच
त्यानी सरकार चालवलं पण अपक्षाला सुधा मंत्री मंडळात पद देऊन त्याने चूक च केली . ते बोले नाही की हा तर अपक्ष आहे त्यात फरक नाही केला चुकलं च .
स्वतच्या नातेवाईक यांच्या अंगावर ईडी धावून आली तरी डगमगला नाही इथ पण चुकलं .
बंडखोरांना मोठ केलं त्यांच्या मुलांना खासदार बनवलं . पण स्वतच्या मुलाला आमदार बनवलं ते पण चुकलं च .
एवढंच काय कोरोणा काळात लोकांचां कुटुंबप्रमुख बनला ते पण चुकलं .
लोकांना हिंदुत्ववाद आणि राष्ट्रवाद कळतं नाही .
राष्ट्रवाद म्हणजे राष्ट्रच कल्याण .
हिंदुत्ववाद म्हणजे हिंदूच्या साठी कल्याण .
पण सध्या राजकीय लोकांनी हिदू मध्येच वाद घालायचा ठरवला त्याला हिंदुत्व वाद अस म्हणतात. नकली हिदू अन् असली हिदू अशी व्याख्या त्यांनी बनवून ठेवली .
आता या दोन्ही शब्द मधे महत्वाचं काय ते म्हणजे आहे राष्ट्रवाद . ज्या मध्ये समाजातील माणसाचं हित आहे . कोणी माणूस जन्माने हिदू किंवा इतर म्हणून जन्माला येतो . त्यात फक्त विचार भरले जातात आणि त्यात फरक केला जातो .
कोणी एक माणूस समाजहितासाठी कोणाच्या विरोधात गेला तर तो कट्टर हिदू नाही असं समजलं जातं .
एकी कडे विज्ञान मानणारे लोक पण माणसात भेद करतात त्याला काय म्हणायचे. काही गोष्टी समाजात शांतता निर्माण सुधा करता येतात हे उध्दव ठाकरे ने सांगितलं हे चुकलं च .

www.janvicharnews.com
शिवसेना एक विचार आहे हिंदुत्वाचा 🚩🚩📢
शिवसेना संघटना याच एक काव्य आहे. त्यातली ओळ नेहमी लक्षात राहते ते
आम्ही शिवाचे सैनिक वेडे,
करू जीवाचे रान,
आम्ही शिवाचे सैनिक वेडे,
करू जीवाचे रान,
पण पुन्हा एकदा भारत देशा
बनवू हिंदुस्थान
आमचा हिंदुस्थान आमचा हिंदुस्थान
भगवे आमचे रक्त तळपतो,
तप्त हिंदवी बाणा..(x2 )
जात,गोत्र अन धर्म अमुचा
शिवसेना , शिवसेना ,शिवसेना
वरदान दिले शौर्याचे आई
भवानीने आम्हास…
वरदान दिले शौर्याचे आई
भवानीने आम्हास…
खडग घेऊनि हाती धरली
हिंदुत्वाची कास..!
लाल किल्यावर भगवा फडको …
लाल किल्यावर भगवा फडको …
हाच एकला ध्यास
महाराष्ट्र धर्म वाढवा
सांगतो शिवबाचा इतिहास
बस पुरे आता ना होऊनि देऊ
माणुसकीची दैना
जात, गोत्र अन धर्म अमुचा
शिवसेना शिवसेना
धगधगता अग्नी चहूकडे
अन मार्ग निखार्याचा
जमला नाही कोणाला
तर दोष न तो त्याचा (x2)
अरे हिशेब आम्ही ठेवत नसतो
अशा भेकडाचा
वाघ एकला राजा
बाकी खेळ माकडाचा
घडवून दावू आम्ही
जे कोणास कधी जमले ना
जात , गोत्र अन धर्म अमुचा
शिवसेना , शिवसेना , शिवसेना
कायापालट कोणाचा या
आम्ही करूनी दावू
मराठवाड्याला हिरवा शालू
आम्ही नेसवून दावू
लचके तोडून पश्चिम घाटा
ज्यांनी हि निदले
धूळ चारुनी त्याना पुन्हा
सोने पिकवून दावू
विदर्भ आमची शान असे
अन मान असे आमुची
कशी छाटूनी देऊ?
आम्ही प्राण पणाला लावू
जळगाव असे हो आमुचे
जितके बेळगाव हि तितके
एकमुखाने महाराष्ट्राचे
गीत मराठी गाऊ
आठवा बॉम्बे चे या मुंबई
आम्ही हो केले ना ?
जात गोत्र अन धर्म अमुचा
शिवसेना , शिवसेना , शिवसेना

www.janvicharnews.com
समाजाला एका भगव्या झेंड्या खाली आणायच काम केले असेल ते शिवसेना ने . जात मध्ये भेद न करता धर्म मध्ये भेद न करता गोत्र मध्ये फरक न करता माणसांना एकत्र आणायचे काम केले असेल ते फक्त शिवसेनेने .
उगाच कट्टर हिदू चा पक्ष म्हणून नावारूपाला आलेला पक्ष म्हणून त्याची ओळख आहे .
आज काल माणूस सोशल मीडिया आय टी टीम च्या अतिरेक मुळे नाटक टोमणे म्हणून टीका करत असाल तर हा तुमचा निव्वळ बालिशपणा आहे. जो समाजाला अंधारात टाकत आहे . माणसाला माणूस म्हणून सुधा पाहू शकत नाही तर माणसात ली माणुसकी लोप पावत चाली आहे असेच वाटत आहे .
धार्मिक उदाहरण द्याच म्हणलं ते हे प्रभू राम पण संयमी होते .
पण आज काल लोकांना माणसाचा संयमीपणा खुपतो हे विशेष आहे
धीरज….