Ø एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रिपद भाजपनं जातीय समीकरण साधण्याचा प्रयत्न केल्याचं म्हटले जाते..
Ø एकनाथ शिंदे यांच्या रुपात मराठा समाजातील नेत्यांना मुख्यमंत्रिपद देऊन भाजपनं जातीय समीकरण साधलं असल्याचं बोलले जाते…
Ø देवेंद्र फडणवीसांच्या सहकाऱ्यांच्या अतिउत्साहावर देखील त्यांनी बोट ठेवलं.
Ø केंद्रीय नेतृत्त्वाच्या निर्णयामुळं देवेंद्र फडणवीसांना आश्चर्याचा धक्का बसला होता ते चेहऱ्यावर दिसलं,
Ø भाजपचा एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करुन एका दगडात तीन चार पक्षी मारण्याचा प्रयत्न केलाय,
Ø भाजपचा पहिला डाव हा शिवसेनेला संपवून टाकायचं हा असेल..
Ø ठाकरे कुटुंबीयांना संपवायचं, ठाकरेंच्या हातातील शिवसेना काढून घ्यायची…
Ø मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपला याचा फायदा होईल…
Ø भाजपला बहुमत मिळेल अशी शक्यता वर्तवली जातेय मात्र भाजपला मुंबई महापालिकेत विजय मिळवू देणार नाही…
Ø भाजपच्या केंद्रीय नेृत्त्ववाकडून देवेंद्र फडणवीसांना सगळं दिलं जातं असा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून हा ब्रेक दिला असावा,,,
Ø भाजपमध्ये व्यक्तिस्तोमाला जागा नसते. देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नाही इतरांसाठी देखील हा नियम असतो, त्यामुळं देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्रिपद देण्यात आलं असावं….
Ø शिंदे यांना मुख्यमंत्रिपद दिल्यानं सहकारी आमदारांना मंत्रिमंडळात स्थान देताना नाराजीचा सामना करावा लागू शकतो. एकनाथ शिंदेंसाठी खातेवाटप अडचणीचं असेल त्यात त्यांनी काळजी घ्यावी, त्यात रस्सीखेच होईल….
Ø उद्धव ठाकरे यांना शह, २०१९ चा हिशोब चुकता केला….
Ø काँग्रेस-राष्ट्रवादीकडून सत्तेचा ऑक्सिजन काढून घेतला….
Ø एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करत आम्हाला मुख्यमंत्रिपदाची हाव नसल्याचा मेसेज देण्याचा प्रयत्न भाजपकडून करण्यात आला आहे….
Ø भाजपने मुख्यमंत्रिपदाचा मोह टाळला असला तरी इतर महत्त्वाची खाती असल्याने राज्याच्या सत्तेची चांगलीच ताकद भाजपला मिळणार आहे. एकीकडे केंद्राची पूर्ण बहुमताची सत्ता पक्षाकडे असताना त्याला आता राज्यातील सत्तेचीही जोड मिळणार आहे. त्यामुळे पक्षसंघटन आणखी बळकट करण्यास आणि कार्यकर्त्यांना ताकद देण्यास भाजपला आणखीनच सोपं होणार आहे….