एमपीएससी खरंच मायाजाल आहे का?
नाही हो असं काहीच नाही. मायाजाल वगैरे हे शब्द जरा जास्तच जड आहेत. राज्यसेवा आयोग म्हणजे जणू कोणी विषकन्या आहे आणि विद्यार्थी म्हणजे तिच्या अडकणारे भक्ष असंच सध्या दाखवलं जातंय.
स्पर्धा परीक्षांचा इतका बाजार होण्याचा कारण म्हणजे इथं वाढलेली गर्दी.
कुठलाच विचार न करता विद्यार्थी पदवीच्या पहिल्या वर्षांपासून पुण्यात येतात.दुर्दैवाने आपल्याकडे कलचाचणी (Aptitude Test) ही संकल्पनाच अजून रुजली नाहीये.मग इथं आल्यावर इथलं वास्तव लक्षात येत पण तोपर्यंत परतीचे दोर कापलेले असतात आणि मग सुरू होतो एक निरर्थक प्रवास जो आपल्या आयुष्यातील मोलाची वर्ष वाया घालवतो(सुदैवाने आयोगाला एक शहाणपण उशिरा का होईना सुचलेले आहे-आता एमपीएसी चे सहाच attempt देता येणार आहेत)
एमपीएससी बद्दल समजा पेक्षा गैरसमजच जास्त आहेत. याला जबाबदार
असे विदयार्थी ज्यांनी कधी फारसा गांभीर्याने अभ्यास केलेला नसतो ,पुण्यात विशेषतः सदाशिव पेठे मध्ये असे खूप महाभाग मिळतील जे अभ्यासाव्यतिरिक्त इतर सगळ्या गोष्टी करतात.
परिक्षेबद्दल अगदीच काही माहीत नसलेले राजकारणी, प्रसारमाध्यमे
दुर्दैवाने एमपीएससी परिक्षाबद्दल नव्या मुलांची वास्तव न सांगून दिशाभूल करणारे अधिकारी मित्र
आणि कोणाची तरी स्फूर्तिदायक भाषणे पाहून थोडया वेळेसाठी प्रेरित झालेले (दुर्दैवाने आयुष्य फक्त प्रेरणेवर नाही चालत)
या पुज्यनिय व्यक्तींकडून तुम्हाला कधीच सत्य परिस्थिचा बोध होणार नाही. इथलं वास्तव थोडंस वेगळं आहे.अनेक विद्यार्थी ज्यांची नुकतीच बारावी झालेली आहे घरदार-कॉलेज सोडून पुण्याला राहायला येतात. वास्तविक याची काहीच गरज नाही पण अनुभवातून आलेले शहाणपण नको असतं कोणालाच.

www.janvicharnews.com
एमपीएससी बद्दल असणारे काही सामान्य गैरसमज.
अभ्यास करायला पुण्यालाच यावं लागत
भरमसाठ फी भरून क्लास करावा लागतो
परीक्षा वेळेवर होत नाहीत.
वस्तूस्थिती:..
www.janvicharnews.com
पुण्यात यावच असं काही नाही, आर्थिक परिस्थिती ठीक असेल तर या अन्यथा जिथं असाल तिथे अभ्यास करा.
कोरोनाचा कालावधी सोडल्यास 2015 पासून आयोग नियमितपणे परीक्षा घ्यायला लागला आहे आणि याचं वेळापत्रक देखील प्रसिद्ध केलं जातं
एकदा अंतिम निकाल लावला की नियुक्ती देणं आयोगाच्या हाती नसतं.ते सर्वस्वी राज्यशासनाच्या अधीन येतं.कोरोना काळात आयोग आणि राज्यशासन यांनी भयंकर दिरंगाई केलेली आहे पण हा प्रश्न(इथं वाढणारी विद्यार्थ्यांची संख्या ) त्यापूर्वी पासूनच डोकं वर काढू लागला होता कोरोना काळा केवळ हे भयाण वास्तव ठसठशीतपणे समोर आलंय इतकंच
याबद्दल माझा अनुभव सांगतो.
मी देखील बहुतांश विदयार्थ्यांसारख्या बऱ्याच चुका केल्या आहेत, सुरवाती पासून ध्येय निश्चित नसणे, एक पद मिळालं होतं तरी ते न घेणे, UPSC सोडून इतर परीक्षांना कमी लेखणे. पण तीन वर्षात काहीच हाती नाही आलं तेव्हा डोक्यात प्रकाश पडला.
सर्वप्रथम कुठलीच परीक्षा कमी नाही आणि हातात काहीच नसणं यापेक्षा काही तरी असणं केव्हाही चांगलं ही डोक्यात प्रिंट करून घेतलं.
आर्थिक दृष्ट्या काही अंशी स्वावलंबी झालो.
चांगले सल्ले ऐकायला सुरवात केली.
माझा सल्ला नाही पण इतकीच विनंती आहे की या क्षेत्रात येण्याअगोदर
www.janvicharnews.com
आपल्याला खरंच वाचन करायला आवडतं का (प्रचंड वाचन करावे लागते-अगदी एकच पुस्तक कित्येकवेळा)
आपल्या घरची परिस्थिती खरंच अनुकूल आहे का नसेल तर काही काम करून अभ्यास झेपेल का(जिद्द असेल तर नक्कीच झेपतो)
केवळ दुसरा करियर ऑपशन नाही किंवा मित्र-मैत्रिणी अभ्यास करतायेत , किंवा कुठल्या अधिकाऱ्याचे Over enthusiastic भाषणाने तात्पुरते प्रेरित आहोत म्हणून आपण इकडे येतोय का
अभ्यास किती वर्षे करणार आहोत आणि आपलं Plan B काय आहे.
याची उत्तर स्वतःलाच प्रामाणिकपणे द्या
मी फक्त हीच परीक्षा देणार ती देणार नाही अगोदरच ठरवू नका. सर्वप्रथम कुठलेही पद मिळणे महत्वाचे त्यानंतर तुमची स्वप्न पूर्ण करा.(आमचे एक सर खुप छान म्हणायचे “अगोदर भाकरीची सोय करा नंतर स्वप्न पूर्ण करा” )
उत्तर कदाचित थोडंस rough काहीसं नाकारत्मक वाटू शकतं पण वास्तव असंच आहे.याचा अर्थ असा नव्हे कि स्पर्धा परीक्षांचा अभ्यासच करू नये ,जरूर करावा पण निर्णय पूर्ण विचारांती घेऊनच कारण एकदा यात पडाल तर बाहेर यायला खूप अवघड होऊन बसतं
शुभेच्या💐💐