ए पी जे अब्दुल कलाम: सृजनशील व्यक्तिमत्व

ए पी जे अब्दुल कलाम: सृजनशील व्यक्तिमत्व

www.janvicharnews.com

                

माझा संदेश, विशेषत: तरुणांना, वेगळा विचार करण्याचे धाडस, आविष्कार करण्याचे धाडस, न सापडलेल्या मार्गावर चालण्याचे धाडस, अशक्य गोष्टी शोधण्याचे धाडस आणि अडचणींवर मात करून यशस्वी होण्याचे धैर्य असणे हा माझा संदेश आहे. हे उत्कृष्ट गुण आहेत ज्यासाठी त्यांनी कार्य केले पाहिजे. हा माझा तरुणांना संदेश आहे.

जपान अचाट बुध्दीचे प्रयोग करणारा देश म्हणून जपानची जगभरात ओळख आहे . जपानी माणसाने केलेली गोष्ट ही नावीन्यपूर्णच असते. काही दिवसापूर्वी जपानची अशीच एक बातमी जगजाहीर झाली. जपानने पाण्याखाली अणुभट्टी उभी केली होती. दुसऱ्या महायुध्दानंतर प्रत्येक देश अन्नवस्त्रांच्या बाबतीत स्वयंपूर्ण होण्याच्या प्रयत्नात आहे. तोच प्रयत्न म्हणून जपानने देखील अणुभट्टी पाण्याखाली उभी करुन जगाला धक्का दिला. जगाकरीता ही गोष्ट नवीन होती. भारतात सुध्दा याचे पडसाद उमटले. सर्व वर्तमानपत्रात ही बातमी ठळकपणे आली. तसा काही पत्रकारांनी तत्कालीन राष्ट्रपतींशी संवाद साधला. त्यांची प्रतिक्रिया विचारली आणि त्यांच्या प्रतिक्रियेने जगाला दुसरा धक्का बसला. भारतीय राष्ट्रपतींनी सांगितले की जपान आपली पाण्याखालची अणुभट्टी उभारत असतानाच मी त्या ठिकाणी भेट देऊन आलोय. त्या अणुभट्टीची मला दहा वर्षापूर्वीच कल्पना होती. सगळे पत्रकार आश्चर्याने राष्ट्रपती महोदयांकडे बघत राहिले.कारण त्यावेळी भारताच्या राष्ट्रपतीपदावर कुणी राजकारणी नव्हे तर एक चतुरस्त्र शास्त्रज्ञ होता. त्यांचे नाव होते डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम ! अब्दुल कलाम हे असे व्यक्तिमत्व आहे की त्यांचे नाव ऐकताक्षणी भारतीय माणसाची मान अभिमानाने उंचावते. तामिळनाडुतल्या एका अशिक्षित मच्छिमाराच्या पोटी जन्माला आलेल्या कलामांचा प्रवास थक्क करणारा आहे. रामेश्वरम् पासून तर राष्ट्रपती भवनापर्यंतचा अशक्यप्राय रस्ता हा कष्ट आणि चिकाटीच्या बळावर सर केला जावू शकतो, हेच कलामांनी दाखवून दिले .

बालवयात समुद्राच्या काठार शिंपले गोळा करतांना आकाशात मुक्तपणे संचार करणाऱ्या पक्ष्यांकडे बघत हा पोर वेगळ्याच स्वप्नामध्ये रममाण व्हायचा आपल्याला देखील पक्ष्याप्रमाणे उडता आले तर किती मस्त होईल.

वास्तविक शिक्षणामुळे व्यक्तीची प्रतिष्ठा वाढते आणि त्याचा आत्मसन्मान वाढतो. जर शिक्षणाचा खरा अर्थ प्रत्येक माणसाला समजला असेल आणि ते शिक्षण मानवी क्रियाकलापांच्या प्रत्येक क्षेत्रात पुढे नेले गेले असेल तर जग राहण्यासाठी खूप चांगले ठिकाण असेल.

ह्या विचारानेच बालमन मोहरून उठायचे आणि हाच विचार ह्या तरुणाला अभियांत्रिकी शिक्षणापर्यंत घेवून गेला. सेंट जोसेफ महाविद्यालयातून बी.एस्सीचे शिक्षण घेतल्यानंतर चेन्नईच्या इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी कॉलेजमध्ये इंजिनियरींगसाठी कलाम आले. परंतू हे दाखल होणे इतके सोपे नव्हते . घरातली सर्वसामान्य परिस्थिती आणि महाविद्यालयाची भरमसाठ अशावेळी पैसे आणायचे कुठून हा प्रश्न मोठा होता. अखेर बहिणीने गव्हातले दागिने आणि हातातल्या बांगड्या गहाण ठेवून भावाला इंजिनिरिंगला प्रवेश मिळवून दिला. सृजनशिल मनाचा हा पोर बहिणीचे उपकार कधी विसरला नाही. कलामांनी इंजिनियरिंगच्या चार वर्षात प्रचंड अभ्यास करत शिष्यवृत्ती प्राप्त केली आणि बहिणीचे दागिने सोडवून आणले. बालवयातच पाहिलेली स्वप्ने पुर्ण करायची संधी तारुण्यात खुप कमी लोकांना मिळते. ती कलामांना देखील प्राप्त झाली. इंजिनियरिंगनंतर पॅरोनॉटीकल अभियंता म्हणून बाहेर पडल्यावर दोन संधी डोळ्यासमोर होत्या. एक हवाई दलात वैमानिक होण्याची आणि दुसरी संरक्षण विभागात वैज्ञानिक म्हणून दाखल होण्याची होती . कलामांचा ओढा हवाई दलात वैमानिक होण्याकडे होता. परंतु आठ जागा साठीच्या मुलाखतीत त्यांचा नववा क्रमांक आला. वैमानिक पदाची जागा हातातून गेली आणि अब्दुल कलाम काजपुरला वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी म्हणून रुजू झाले. प्रत्यक्ष विमान उडवण्याचे स्वप्न जरी पुर्ण होणार नसले तरी विमानाला उडण्यायोग्य बनवण्याचे काम कलामांच्या नेतृत्वात सुरू झाले . त्यातच एक महत्वाकांक्षी प्रकल्प त्यांच्यावर सोपवला गेला. पाण्यावर खडकाळ जमिनीवर तसेच हवेतून मुक्तपणे संचार करू शकणारे हॉवरक्राफ्ट वाहन बनवण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली. कुठलेही अनुभव पाठीशी नसतांना ह्या माणसाचे काम करायला सुरुवात केली. त्याबाबत विचारले असता कलाम म्हणतात अनुभव पाठीशी नव्हता पण आत्मविश्वास मात्र त्या राईट बंधु इतकाच होता. विमानाचा शोध लावण्यापूर्वी राईट बंधुची जोडी सारखं दुरुस्तीच काम करायची . ते तर विमानाचा शोध लावू शकतात मग आपण सुध्दा हॉवस्कॉफ्ट मॉडेल बनवू शकते. हा विश्वास कलामांना होता.

www.janvicharnews.com

हॉवरक्राफ्ट च्या निमित्ताने कलामांना मिळालेली ही खुप मोठी संधी होती. तिचे सोनं करायचेच ह्या अनुषंगाने त्यांनी कामाला सुरुवात केली. हॉवरक्राफ्ट मॉडेल आकाराला येत होते. गणनायक शंकराचे वाहन असणाऱ्या नंदीचे समर्पक नाव त्याला देण्यात आले. आणि त्यातच एके दिवशी तत्कालीन संरक्षणमंत्र्यांनी नंदीचे काम कुठपर्यंत आलयं हे बघण्याची आणि त्यातून प्रत्यक्ष उडण्याची इच्छा व्यक्त केली. सुरक्षा अधिकाऱ्यांनी मात्र स्पष्ट पणे नकार दिला. कुठलाही अनुभव नसणाऱ्या वैज्ञानिकाने बनवलेल्या यानातून देशाच्या संरक्षण मंत्र्यांनी प्रवास करणे धोक्याचे आहे , असे त्यांचे मत होते. परंतू संरक्षण मंत्र्यांना बहुतेक कलामांच्या नजरेतला आत्मविश्वास असावा त्यांनी सुध्दा अधिकाऱ्यांच्या सुचनेला केराची टोपली दाखवत नंदीतून प्रवास करायचे ठरवले. अब्दुल कलाम तर निशब्दच होते. संरक्षण मंत्र्यांच्या आदेशानुसार नंदी चालु करण्यात आला. अब्दुल कलामांसमवेत संरक्षण मंत्र्यांनी जागा ग्रहण केली. सुरक्षा रक्षक सोबत बसले . आणि त्यांच्या प्रचंड कडकडाट झाला कारण नंदीचे उड्डाण यशस्वी ठरले होते. कलामांवर सोपवलेली जबाबदारी त्यांनी चोखपणे बजावली.५५०किलोपर्यंत वजन वाहून नेणारे हॉवरक्राफ्ट वाहन नंदीची निर्मिती यशस्वी झाली. परंतु राजकीय उलथापालथ झाली सरकार बदलले. नंदी हॉवरक्राफ्ट फायलीच्या सरकारी ढिगाऱ्यात अडकला आणि त्याच्यावर धुळखात पडण्याची वेळ आली. अनेक वर्षापूर्वी कलामांनी बनवलेले हॉवरक्राफ्ट आजही आमचा देश आयात करतो. कदाचित त्याकाळात राजकिय हस्तक्षेप झाला नसता तर ही वेळ आली नसती. अधिक काय बोलावे.

डॉ.अब्दुल कलाम यांनी कानपूरनंतर इन्कोस्पायरमध्ये डॉ. विक्रम साराभाई यांच्या नेतृत्वात काम सुरु केले. अनेक देशोपयोगी महत्वाकांक्षी प्रकल्पांवर काम करत असतांना कलामांना विक्रम साराभाईंचे मोलाचे मार्गदर्शन लाभले होते. डोंगराळ गा लष्काराला उपयोगी ठरणाऱ्या राटो इंजिनाचे काम साराभाईनी कलामांवर सोपवले. कलामांनी देखील ह्याकामात स्वत : ला झोकुन दिले. अनेक सहकारी मनापासून मेहनत घेवु लागले . हाताखाली काम करणाऱ्या माणसाला जर कनिष्ठ वागणूक दिली तर त्याचे काम कनिष्ठ असते . उलट त्याच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकत त्याला प्रोत्साहीत केले तर मिळणारे रिझल्ट खुप वेगळे असतात. हा धडाच कलामांनी गिरवला.

www.janvicharnews.com

राटो नंतरच्या उपग्रहासंदर्भातल्या महत्वाच्या कामाचा टप्पा साराभाईनी कलामांवर सोपवला. काम चालु होते. भारताच्या अवकाश संशेधन कार्यक्रमाचे प्रमुख असणारे साराभाई कलामांना मार्गदर्शन करत होते. ३० डिसेंबर १९७१ रोजी उपग्रहांच्या डिझाईनच्या परिक्षणासाठी साराभाईनी कलामांना त्रिवेंद्रम विमान तळावर बोलावले. पण विमान तळार उतरत असतांनाच कलामांच्या कानावर बातमी पडली. डॉ.विक्रम साराभाई यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. अब्दुल कलाम यांच्यासाठी हा प्रचंड मोठा धक्का होता. अखेर नियतीच्या मनात काय असते हे कुणालाच अब्दुल कलामांनी भरून काढली हे मात्र नक्की! कळत नाही. भविष्यात साराभाईच्या निधनामुळे निर्माण झालेली पोकळी अब्दुल कलामांनी भरून काढली हे मात्र नक्की!

इस्त्रोला दिलेल्या आकारानंतर भारत सरकारने अब्दुल कलाम यांची नेमणूक ” गाइडेड मिसाईल डेव्हलपमेंट प्रोग्राम ” ( GMDP ) मध्ये केली. भारताला संरक्षण दृष्ट्या मजबूत करण्यासाठी अणुवस्त्रांवर काम करणारा हा विभाग आता अब्दुल कलाम यांच्या नेतृत्वाखाली बाळसे धरु लागला. डेव्हिल नावाचे क्षेपणास्त्र अयशस्वी ठरल्यामुळे निराशेच्या गर्तेत अडकलेल्या GMDP मध्ये कलामांनी नव्याने जान ओतली. नवीन योजना आखून त्या सरकारसमोर ठेवल्या. मंजुर करून घेतल्या आणि GMDP ची घौडदौड सुरु झाली . आता तिला थांबवणे कुणालाच शक्य नव्हते.

 अनेक अडचणी कलमांसमोर उभ्या राहात होत्या. परंतु निसर्गाचा नियम आहे. जे धडपड करतात त्यांनाच वेदना होतात आणि वेदनेशिवाय मिळालेले यश कवडीमोलाचे असते. कारण पोहायचे असेल तर सागरात उडी मारलीच पाहिजे . किनाणाऱ्यावर उभे राहून पोहता येत नाही. यशाचे सुत्र सुध्दा तसेच आहे. जमिनीवरून जमिनीवर लक्ष्यवेध घेणारे पृथ्वी रणगाडा उध्वस्त करणारे नाग यासह त्रिशुळ , अग्नी असे एकापेक्षा एक क्षेपणास्त्र कलमांच्या नेतृत्वात निर्माण होवू लागले . क्षेपणास्त्र म्हणजे फक्त अमेरिका , रशिया यासारख्या महासत्ताचीच मक्तेदारी आहे हा समज कलमांनी खोडून काढला . आणि भारताला जगात एक प्रबळ स्थान प्राप्त करुन दिले.

 अग्नि क्षेपणास्त्राच्या निर्मितीचा अनुभव तर कलमांच्या सयंमाचे दर्शनच घडवतो. २० एप्रिल १९८९ रोजी अग्नीचे उड्डाण होणार होते. सगळे काही सुरळीत सुरु होते. पण अखेरच्या काही क्षणात अडचण निर्माण झाली आणि अनीचे प्रक्षेपण रद्द झाले. प्रसारमाध्यमांनी प्रचंड टिकेची झोड उठवली पण कलाम घाबरले नाहीत. १ मे १९८९ रोजी त्यांनी पुन्हा अनिच्या प्रक्षेपणाची तयारी केली परंतू अखेरच्या दहा सेकंदात क्षेपणास्त्र व्होल्ड झाले . आता मात्र मिडियातून कलमांसहित त्यांच्या सहकाऱ्यांची खिल्ली उडवली जावू लागली. अनी क्षेपणास्त्र तर सर्वांच्या चेष्टेचा विषय ठरले. हिंदुस्थान टाईम्ससारख्या वर्तमानपत्राने तर व्यंगचित्र काढून लिहीले नाही! भारतीय संशोधकांनी शांततावादी अहिंसक क्षेपणास्त्र बनवलयं, जे उडतच  नाही.

अब्दुल कलामांचे सृजनशिल मन मात्र यामुळे अस्वस्थ झाले होते. गोंधळेल्या आपल्या सहकाऱ्यांमध्ये कलमांनी पुन्हा उत्साह पेरला. २२ मे १९८९ रोजी पुन्हा अग्नीचे उड्डाण घ्यायचे ठरल. पुन्हा त्यांनी तयारी सुरु केली आणि सकाळी ७ वाजता अग्नी आकाशात झेपावले. सारा भारत आनंदाने न्हावून निघाला. जगाला मात्र हादरा बसला. पाश्चिमात्य राष्ट्रांनी भारताबद्दल टिप्पणी सुरु केली. निर्बंध लादण्याचा प्रयत्न केला. परंतु भारत सरकारने कशालाही भीक घातली नाही . उलट अब्दुल कलाम यांना पद्यविभुषण देवून जगाला चोख प्रत्युत्तर दिले. अब्दुल कलमांसारख्या शास्त्रज्ञाचे मन जितके संशोधक आहे त्यापेक्षा कितीतरी जास्त सृजनशिल आहे. इतक्या मोठ्या पदावर कार्यरत असतांना देखील छोट्याशा खोलीत राहणारा हा माणुस जितका विलक्षण आहे तितकाच त्यांच्या आयुष्याचा प्रवाससुध्दा अद्भुत आहे. १९९७ साली भारतरत्न ह्या सर्वोच्च किताबाने सन्मानित झालेले अब्दुल कलाम २००२ साली भारताचे राष्ट्रपती झाले. किरकोळ अपवाद वगळता देशातल्या सर्व पक्षांनी त्यांचे समर्थन केले. कुठल्याही राजकीय पक्षाशी संबंधित नसणाऱ्या ह्या व्यक्तिमत्वाचे २०२० चा नारा दिला आणि भारताला महासत्ताक बनवण्याचे त्यांचे स्वप्न तरुणाईला मोहरून गेले. सर्वसामान्य मच्छिमाराच्या पोटी जन्माला आलेला ह्या पोराला देशातला प्रत्येक माणुस आदर्श मानतो. अशिक्षित कुटुंबात जन्माला येणारे आणि बहिणीचे दागिने गहाण ठेवून शिक्षण घेणारे अब्दुल कलाम त्यांची झेप केवढी पाहिजे? देशाच्या सर्वोच्च पदापर्यंत झेप घेत असतील तर ज्यांच्याकडे सगळे आहे

अब्दुल कलामांचे प्रेरणादायी विचार

यशाच्या वाटेवर जर आपल्याला निराशेचा सामना करावा लागला तर याचा अर्थ आपण प्रयत्न करणे थांबवले असा होत नाही कारण प्रत्येक निराशा आणि अपयशामागे यश दडलेले असते.

महान शिक्षक होण्यासाठी तीन गोष्टी सर्वात महत्त्वाच्या असतात – ज्ञान, आवड आणि करुणा.

तरुणांना माझा संदेश आहे की, चौकटीच्या बाहेर विचार करा, काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करा, नेहमी स्वतःचा मार्ग तयार करा आणि अशक्य ते साध्य करा.

वास्तविक शिक्षणामुळे व्यक्तीची प्रतिष्ठा वाढते आणि त्याचा आत्मसन्मान वाढतो. जर शिक्षणाचा खरा अर्थ प्रत्येक माणसाला समजला असेल आणि ते शिक्षण मानवी क्रियाकलापांच्या प्रत्येक क्षेत्रात पुढे नेले गेले असेल तर जग राहण्यासाठी खूप चांगले ठिकाण असेल.

“आत्मविश्वास आणि कठोर परिश्रम हे अपयश नावाच्या आजाराला मारण्यासाठी सर्वोत्तम औषधे आहेत.”

  • “शिकण्याने सर्जनशीलता येते, सर्जनशीलता आपल्याला विचार करण्यास प्रवृत्त करते, विचार ज्ञानाकडे नेतो, ज्ञान आपल्याला महान बनवते. ,

 

  • ज्ञानी वृद्धाचा मृत्यू म्हणजे एक प्रचंड ग्रंथालय जाळणे.

 

  • “विकले गेलेले पत्रकार, घाबरलेले विरोधक आणि मृत लोक या तिन्ही लोकशाहीसाठी धोकादायक आहेत”

 

  • ज्या दिवशी आमची स्वाक्षरी ऑटोग्राफमध्ये बदलेल, त्या दिवशी तुम्ही यशस्वी झालात असे समजा.

 

  • वास्तविक शिक्षणामुळे व्यक्तीची प्रतिष्ठा वाढते आणि त्याचा आत्मसन्मान वाढतो. शिक्षणाचा खरा अर्थ जर प्रत्येक माणसाने समजून घेतला आणि मानवी क्रियाकलापांच्या प्रत्येक क्षेत्रात पुढे नेले तर जग राहण्यासाठी खूप चांगले ठिकाण असेल.
  • शिक्षणतज्ञांनी विद्यार्थ्यांमध्ये चौकशी, सर्जनशीलता, उद्योजकता आणि नैतिक नेतृत्वाची भावना रुजवली पाहिजे आणि त्यांचे आदर्श बनले पाहिजे.
  • अध्यापन हा एक अतिशय उदात्त व्यवसाय आहे जो व्यक्तीचे चरित्र, क्षमता आणि भविष्य घडवतो. जर लोकांनी मला एक चांगला शिक्षक म्हणून लक्षात ठेवले तर तो माझ्यासाठी सर्वात मोठा सन्मान असेल.
Scroll to Top