करिअर निवड हिच यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली

करिअर निवड हिच यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली

www.janvicharnews.com

लहानपणी एखादया छोट्या मुलाला अथवा मुलीला ‘तू मोठेपणी कोण होणार?’ हा प्रश्न विचारला, तर त्यांचे उत्तर तयार असते, मी डॉक्टर, इंजिनीअर, वकील, वैमानिक, शिक्षक, नट होणार: मुलीकडून मी हवाई सुंदरी अगदी विश्व सुंदरी होणार असेही उत्तर मिळते. खरंतर आपल्या आजूबाजूस असणाऱ्या विविध व्यवसाय करणाऱ्या व्यक्ती. दूरदर्शनसारख्या माध्यमातून दृष्टीस पडणारी व्यक्तिमत्त्वे या साऱ्याचा प्रभाव त्यांच्या या उत्तरात असतो. असे जरी असले, तरी प्रत्येक मुला-मुलीच्या मनात आपल्या भविष्यातील व्यवसायाचे एक स्वप्न सुप्त इच्छा असते, पण यांपैकी किती जणाची स्वप्न प्रत्यक्षात उतरतात? किती विदयार्थी योग्य तो मार्ग निवडून भविष्यात यशस्वी होतात? हा प्रश्न आहे. या प्रश्नाचे नकारार्थी उत्तर हे योग्य ते ‘करिअर’ निवडले नाही अथवा त्या दृष्टीने योग्य ती तयारी केली नाही यामुळे येते.

करिअर‘ (Career) महणजे नेमके काय? असा प्रश्न बऱ्याचदा पडतो. करिअर म्हणजे नोकरी? व्यवसाय?  घंटा?  व्यापार? शब्दकोशातील अर्थानुसार हे सर्व ठीक आहेत. पण करिअर शब्दाचा अर्थ एवढा सोपा नाही, तसेच करिअर निवडणे हेसुद्धा सोपे नाही. भविष्यातील व्यावसायिक वाटचाल यादृष्टीने त्याकडे पाहिले, तर त्यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता मिळवणे आवश्यक कौशल्य प्राप्त करणे, शारीरिक, मानसिक, बौद्धिक तयारी करणे आवश्यक तो व्यक्तिमत्त्वविकास साधून आत्मविश्वास प्राप्त करणे आणि यशस्वी मुलाखती व व्यवसायातील प्रगतीसाठी आवश्यक संवाद व संभाषण कौशल्य संपादन करणे असा हा आयुष्यातील प्रवास आहे.

पूर्वीच्या काळी म्हणजे आधीच्या पिढीमध्ये नोकरी किंवा व्यवसाय यांच्या काही विशिष्ट वाटा प्रस्थापित होत्या. त्यामुळे सरकारी खात्यात. बँकामध्ये नोकरी, शिक्षक असे काही व्यवसाय सहज उपलब्ध होते. ते सुद्धा आजच्या तुलनेत कमी शैक्षणिक पात्रतेवर, पण आजच्या एकविसाव्या शतकात वाढते शहरीकरण, जागतिकीकरण यांमुळे, तसेच संगणकीय व माहिती तंत्रज्ञानाच्या युगात सर्वच क्षेत्रांत स्पर्धा वाढली आहे. त्यामुळे चांगले करिअर निवडणे व त्यामध्ये यशस्वी होणे कठीण झाले आहे. परिणामी, विद्याथ्यपिक्षा आजकाल पालकांनाच जास्त भेडसावणारा प्रश्न उभा राहतो तो म्हणजे 10 वी 12 नंतर पुढे काय? कारण 10 ची नंतर विज्ञान, कला, वाणिज्यशाखा यांपुरते सीमित करून घेतल्यानंतर 12 वी नंतर खन्या अर्थानि भविष्यातील व्यावसायिक वाटचालीसाठी अभ्यासक्रम निवडीची वेळ येऊन ठेपते.

www.janvicharnews.com

सध्याच्या 10 + 2 + 3 या शिक्षण पद्धतीनुसार 10 वी नंतरच विद्यार्थी आपल्या भावी करिअरच्या दृष्टीने आपला मार्ग ठरवत असतात. 10 वी नंतर प्रथम कला, वाणिज्य व विज्ञानशाखा असे तीन पर्याय सर्वांसाठी उपलब्ध असतात त्यामुळेच 11 वी मध्ये प्रवेश घेतानाच विद्यार्थी साधारणतः आपले भावी अभ्यासक्रम व व्यवसाय कोणत्या शाखेशी निगडित असणार आहे हे ठरवून पेतो. पण इथेही साधारणतः एक ट्रेंडदिसतो. 10 वी मध्ये साधारणतः 75 पेक्षा जास्त गुण मिळवलेले विद्यार्थी विज्ञानशाखेकडे जाऊ इच्छितात किंवा किमान त्याच्या पालकांची तशी इच्छा असते व साधारणतः 60 किंवा तत्सम कमी गुण मिळवलेले विद्यार्थी वाणिज्य किवा कलाशाखा निवडतात; पण इथेही विदयार्थ्यांचा कल त्याची आवड व त्याची कुवत विचारात घेणे आवश्यक आहे.

करिअरकसे निवडावे? असे म्हटले जाते, की कोणत्याही क्षेत्रात करिअर करायचे म्हणजे त्याची आवड असावी लागते. त्यादृष्टीने कल असावा लागतो. कल (aptitude) म्हणजे काय? तर ती गोष्ट करण्यासाठी आवश्यक मानसिक ताकद, कौशल्य, अतः स्पर्धा व यशस्वी होण्याचा आत्मविश्वास यांचा संगम आहे. त्यामुळेच अलीकडे कल चाचण्या घेऊनच योग्य करिअर निवड करण्याचा प्रयत्न केला जातो; पण तरीही करिअर निवडण्याच्या पायरीवर उभे असताना आपण स्वतःला काही प्रश्न विचारून उत्तर शोधण्याचा प्रयत्न करता येईल असे वाटते.

  • मला हा व्यवसाय / हे क्षेत्र का निवडायचे आहे?
  • माझे मित्र/मैत्रिणी या अभ्यासक्रमास जात आहेत म्हणूनच मी जात आहे का? माझ्या आई-वडील अथवा नातेवाईकाच्या इच्छेनुसार / दबावामुळे मी हा निर्णय घेतला आहे का?
  • या व्यवसायात नोकरीत खूप पैसे मिळतील म्हणून हा व्यवसाय मी निवडला आहे का?
  • इतर कुठल्या चांगल्या क्षेत्राची माहिती नाही म्हणून हे क्षेत्र निवडावेसे वाटले का? हे क्षेत्र खूप आकर्षक व प्रसिद्धी देणारे आहे म्हणून मी निवडले आहे का?
  • मला फक्त हेच क्षेत्र आवडते म्हणून मी निवडले आहे का? या क्षेत्रात काहीतरी करून मला आनंद मिळवायचा आहे, म्हणून मी निवडले आहे का?
  • या क्षेत्रात यशस्वी / नोकरीत जाण्यासाठी माझ्याकडे शारीरिक क्षमता आहे का?
  • या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी मी खूप वेळ देण्यास तयार आहे का?
  • या अभ्यासक्रमासाठी आवश्यक खर्च करण्यास माझे पालक समर्थ आहेत का? किंवा त्याची सोय होऊ शकते का?
  • कदाचित पैसे कमी पडल्यास शिकत असतानाच काम करून मी उभे करू शकते का?
  • या अभ्यासक्रमासाठी उपलब्ध सरकारी शिष्यवृत्ती, कर्ज यांसारख्या गोष्टीची माहिती मी घेतली आहे का?
  • या क्षेत्रात जाण्यापूर्वी मी स्वाभाविक कलचाचणी करून घेतली आहे का?
  • या क्षेत्रात / नोकरीत प्रत्यक्षात काम करत असलेल्या एखादया व्यक्तीकडून या व्यवसायाची अथवा कामाची अधिक सविस्तर माहिती मी करून घेतली आहे का?
  • या व्यवसायाचा / नौकरीचा भाग म्हणून मी माझ्या कुटुंबापासून दूर राहू शकतो का?
  • सारखा प्रवास करू शकतो का?
  • जर मी निवडलेल्या क्षेत्रात यशस्वी झालो नाही, तर मी पर्यायाचा विचार केला आहे का?

वरीलपैकी किती प्रश्नाची उत्तरे होकारार्थी अथवा नकारार्थी आहेत यात म्हणजेच या प्रश्नांच्या उत्तरांत आपली तयारी व त्यामागोमाग येणारे यश लपलेले आहे. खरतर पूर्वी प्रत्येक गावामध्ये बारा बलुतेदार असत व ते एक विशिष्ट व्यवसाय करत असत. आजही आपल्या अवतीभोवती विविध व्यवसाय, नोकरी करणारे लोक आपल्याला दिसतात. खरंतर यांपैकीच एक आपण आपल्या पुढील व्यावसायिक वाटचालीसाठी निवडणार आहोत. त्यामुळे, त्यासाठी आवश्यक असणारा अभ्यासक्रम तसेच तेथे घ्याव्या लागणाऱ्या प्रवेशापासून नोकरी मिळवण्याच्या अथवा व्यवसाय सुरू करण्याच्या पायरीपर्यंत संपूर्ण माहिती करून घ्यावयास हवे. थोडक्यात, ध्येय गाठण्यासाठी उद्दिष्ट ठेवायला हवे व त्या दिशेने मार्गक्रमण करायला हवे. नोकरीच्या व व्यवसायाच्या अनेक संधी व पर्याय आपल्यासमोर आहेत. आपला कल व आपली आवड यातून अचूक निवडलेला पर्याय आपले यशस्वी करिअर घडवेल यात शंकाच नाही…

डॉ.ए.के पाटील

Scroll to Top