आहारात समावेश केलात तर तुम्हाला आश्चर्यकारक फायदे मिळतील.याचे एक नाही तर अनेक मोठे फायदे आहेत.

भारतीय संस्केकृतीमध्ळीये केळीला खूप महत्वाचे स्थान आहे . केळी व केळीच्या पान खोड यांचा उपयोग धार्मिक विधीसाठी केला जातो हे सर्वश्रुत आहे.उपवास असो अथवा डाएट असो मेनू लिस्ट मध्ये केळी हे सर्वांच्या पसंतीचे फळ आहे स्वादिष्ट, पौष्टिकतेसह सहजरीत्या उपलब्ध होणार हे फळ आहे ,जे खाल्ल्याने तुमच्या शरीराला भरपूर कॅल्शियम मिळते. या फळाचे एक नाही तर अनेक मोठे फायदे आहेत.
जर तुम्ही याचा आहारात समावेश केलात तर तुम्हाला आश्चर्यकारक फायदे मिळतील.
१.रक्ताभिसरण नियंत्रित ठेवण्यासाठीही केळी खूप उपयुक्त आहे.
२. वजन नियंत्रित ठेवण्यासाठीही केळी खूप उपयुक्त आहे.
३. ज्या लोकांचे पोट नेहमी खराब असते त्यांनी या फळाचा आहारात समावेश करावा. ते खाल्ल्याने पचनक्रिया मजबूत होते. त्यामुळे पोटफुगीची तक्रारही हळूहळू संपेल.
४.हे फळ खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते.
५.केळी सेवन केल्याने तुमचे हृदयही चांगले राहते. म्हणजेच हृदयरोगी देखील या फळाचे सेवन करू शकतात. याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल.
६.अशा लोकांच्या शरीरात कॅल्शियमचे प्रमाण खूपच कमी असते, त्यांनी केळीचा आहारात समावेश करावा.
७ अधिक तणाव जाणवत असल्यास केळी खावीत.
८ ब्लड प्रेशरचा त्रास असल्यास अथवा तुम्ही लवकर थकत असाल तर केळ्यांचे सेवन करावे. केळ्यात मोठ्या प्रमाणात पोटॅशियम असते ज्यामुळे शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत राहतो.
९. भूक शमविण्यासाठी केळे खाणे फायदेशीर ठरते. केळ्यात मोठ्या प्रमाणात थायमिन, रिबोफ्लेबिन, नियासिन, फॉलिक अॅसिड सारखी पोषक तत्वे असतात जी आपल्या शरीरासाठी गरजेची असतात. केळी योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात खाल्ल्यास त्याचे शरीराला अधिक फायदे होतात.
१०. केळीमुळे रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढते
(विशेष सूचना: दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे ,आमचा उद्देश फक्त तुम्हाला माहिती देणं हा आहे