
www.janvicharnews.com
आम्ही सरकारला कर देतो इतका कि इतिहासात कोणत्याही जूलमी राजा, सुलतान, बादशहा ने घेतला नाही.चक्क अठरा टक्के जीएसटी !तो ही एकदा नाही ,ती वस्तू जितक्या लोकांकडे इकडून तिकडे विकली केली,तितक्या वेळा.एक शंभर रूपयाचा बनियन किंवा अंडरवियर निर्माता कडून मधील चार वेळा व्यापाऱ्यांनी विकला तर चार वेळा जीएसटी लागते.असे नाही कि,एकदा भरली आहे तर पुन्हा नको.शंभर रुपयाच्या बनियनवर बाहत्तर रूपये जीएसटी.म्हणजे जितका उत्पादन खर्च उत्पादकाला येतो तितकाच कर बनियान विक्रेता व्यापारी सरकार ला आणून देतो.कोठून? युजर्स च्या खिशातूनच.
वाहन घेतांना रोड टैक्स घेतात ना?मग,तोच रोड नवीन डांबरीकरण किंवा सिमेंटचा केला तर पुन्हा टोल टैक्स का? म्हणजे आम्ही गाडी घेतांना जे रस्ते उपलब्ध आहेत,बनलेले आहेत त्यावर चालवण्याचे भाडे दिले आहे.वीस वर्षाचे एकठोक. भाडेच ते.रोडवर गाडी चालवण्याचे भाडे.आणखी तोच रोड रिपेअर करण्याचे नवीन भाडे.ही चक्क लुट आहे,आधिकाराचा गैरवापर करून.भारतीय इतिहासात असे कुठे घडले असेल का? मला वाचण्यात आले नाही .मला वाटते ,हिंदूवर झिजिया कर सुद्धा इतका नसेल.कुठेतरी उल्लेख असेल तर जाहीरपणे लिहा.आपण जिझिया कर आणि मोदी कर यांची तुलना करू.
या कराच्या विरोधात कोणताही आमदार खासदार बोलत नाही.का?यांना हे आर्थिक शोषण मान्य आहे.का?भरमसाठ पैसा जमा झाला कि आमदार खासदार मंत्री ला खोऱ्याने लुटता येतो.हे लुटमार कसे करतात?त्यावर कोणाचा अनुभव, अभ्यास असेल तर लिहा.माझ्याकडे तोकडी माहिती उपलब्ध आहे.कोणी प्रामाणिक आमदार खासदार मंत्री अजून तरी जन्माला आला नाही, ज्यांनी लोकांना हे गोलमाल सांगितले असेल.हे समजतात, मतदारांना माहिती देऊन हुषार करू नका.लोक हुषार झाले तर आमदार खासदार मंत्री ची कॉलर पकडून विचारतील,सांग रे चोरा,अर्धा निधी चोरला कोणी?,
जिल्ह्यात डीपीडीसी च्या माध्यमातून निधी राज्य सरकार व केंद्र सरकार टाकते.आमदार, खासदार मंत्री, कलेक्टर,झेडपी सीईओ हे पदसिद्ध सदस्य असतात.सर्वाधिक बदमाष आमदाराला पालकमंत्री बनवून डीपीडीसीच्या धनावर नागोबा बसवला जातो.त्यासाठी तो किती शिक्षीत आहे, किती प्रामाणिक आहे हे पाहिले जात नाही.काही सदस्य झेड पी सदस्य व नगरसेवक मधून घेतात.ते सुद्धा कानाखालचे असतात.प्रश्न विचारणाऱ्या दिडशहाण्या माणसाला घेतले जात नाही.पालकमंत्री अध्यक्ष आणि कलेक्टर सचिव असतो.का? कदाचित पालकमंत्री ला तितकी अक्कल नसावी,हिशोब करता येत नसला तर कलेक्टर मुद्दाम सचिव म्हणून नियुक्त असतात.शिवाय तो युपीएससी अधिकारी असल्याने आडदांड पालकमंत्री ला जुमानणार नाही.पण होते उलटेच.पालकमंत्री रुबाबात कलेक्टर ला बोलतात,शहाणपण शिकवायचे नाही, आम्ही प्रस्ताव वर सही केली कि गुमान सही करा.देशप्रेम , देशभक्ती वगैरे आम्ही कोळून प्यायलो आहोत.अजून तरी पालकमंत्रीला नाकारणारा कलेक्टर भारतीय प्रशासकीय सेवेत आला नाही.दुर्भाग्य आमचे! दुर्भाग्य या राज्याचे! दुर्भाग्य या देशाचे! मंदिर खूप झालेत.पण माणसात राम उरला नाही.काय उपयोग? असा अनुभव आमच्या जळगाव जिल्ह्यात आलेला आहे.पालकमंत्रीने न घेतलेल्या वैद्यकीय यंत्रसामग्री चा निधी सुध्दा रफादफा केला.पण कलेक्टर ने थांबवले नाही.कधीच म्हटले नाही,थांब चोरा,मी नाही करीत चेकवर सही.मी नाही करीत वितरण शीट वर सही.असाल तुम्ही मंत्री.मी पण कलेक्टर आहे.तुमच्या जिवावर नोकरीला लागलो नाही.तुम्ही गोलमाल करतात म्हणून तुमची परीक्षा दर पांच वर्षांनी होते.माझी एकदाच झाली.ती रिटायर होईपर्यंत पुन्हा नाही.
जळगाव जिल्ह्यात अकरा आमदार, दोन खासदार आहेत.यात सर्वच एका पक्षाचे असते तर समजून घेतले असते.सर्वच कौरव आहेत, द्रौपदी चा बचाव होणार नाही.पण येथे तर भाजपचे चार,सेनेचे पांच, राष्ट्रवादी चा एक, कांग्रेस चा एक असे आमदार आहेत.पण सर्व एकाच थालीके चट्टेपट्टे.कोरोना काळातील निधी अपहार झाला तर किमान भाजपचे चार आमदार,दोन खासदारांनी आक्षेप घेतला पाहिजे होता.पण नाही.किमान कांग्रेस च्या आमदाराने तरी.पण नाही.राष्ट्रवादीच्या आमदाराने तरी.पण ते ही नाहीत.उलट शिवसेनेचे आमदार चिमणराव पाटील यांनी डीपीडीसीत आणि विधानसभेत आक्षेप घेतला. अरे येथे , घोटाळा झाला रे!.पण त्यांनाही चूप बसवले गेले.आबासाहेब, सरकार आपले आहे.चूप बसा.घोटाळा करण्यासाठीच आपण आमदार निवडून आलो आहोत.घोटाळा नाही केला तर निवडणुकीत खर्च तरी कसा करायचा?शेती बंगला विकून करायचा का? चूप बसा! पुढील निवडणुकीत तुम्हाला उमेदवारी मिळणार नाही,याची तरतूद करून ठेवली आहे आम्ही.
इकडे आमदार चिमणराव पाटील म्हणत कि,शेवट शेवट मला मंत्रीपद मिळाले पाहिजे.तिकडे आमदार किशोर पाटील म्हणत कि,शिंदे साहेब पाचोरा ला गुपचूप आले , आशिर्वाद मिळवून दिला म्हणून मुख्यमंत्री झाले.मंत्रीपद मला मिळाले पाहिजे.तिकडे आमदार चंद्रकांत पाटील स्पर्धेत उतरले होते.म्हणे मी जायंट किलर आहे.मला मंत्री बनवा. पण वर्णि लागली ती गुलाबराव पाटलांची.आम्ही तर मुंबई , मलबार हिल वर जाऊन शिंदे साहेबांना प्रत्यक्ष भेटून सांगितले होते कि, गुलाबराव पाटील यांचेवर कोरोना निधीच्या अपहाराचे आरोप आहेत.मंत्री करू नका.शिंदे साहेब म्हणाले,असे तर सर्वच आमदार भ्रष्टाचारी आहेत.तर मंत्री कोणालाच बनवता येणार नाही.
बाप रे! भयानक उत्तर मिळाले.आम्ही म्हटले,जय शिवाजी,जय भवानी! वंदे मातरम! मेरा भारत महान!
संपुर्ण महाराष्ट्रातील आमदारांना विनंती करतो कि, आम्ही करदाता जनतेला अवगत करावे कि,

www.janvicharnews.com
डीपीडीसीचे कामकाज कसे चालते?
डीपीडीसी निधीचे वितरण कसे होते?
यावर नियंत्रण कसे ठेवता येईल?
ज्याने चोरले ते कसे वसुल करता येईल?
पालकमंत्री ची मुजोरी कशी थांबवता येईल?
कलेक्टर चे मनोबल कसे वाढवता येईल?
अन्य सदस्याचा आक्षेप कसा सक्षम होईल?
यावर सर्विस्तर माहिती द्यावी.आपण वेळ द्यावा.आम्ही जळगाव ला आपली सभा आयोजित करतो.एकदा कळू द्या ,आम्ही लोकांना कि,हे गोलमाल होते कसे?हे मालामाल होतात कसे ? ँँ
… शिवराम पाटील