
👉 दहावीचे वर्ष नेमके पौगंडावस्थेतील नाजूक काळातच येते. त्यामुळे या काळात मुलांमध्ये मानसिक व शारीरिक अशा दोन्ही स्तरांवर बदल होत असतात. अशा वेळी स्वतःला उत्तम मार्क पाडून सिद्ध करण्याचे दडपण मुलांवर नकळत येते. त्यामुळे मुलांशी योग्य पद्धतीने संवाद साधणे व त्यांना समजून घेणे, ही खरे तर जबाबदारी पालकांचीच आहे, असे मला वाटते.
👉 दहावीत मिळालेले यश किंवा अपयश किंवा जरी कमी मार्क मिळाले असतील तरी, हे नॉर्मल मानले पाहिजे. पुढे आयुष्यात मुलांना चुका सुधारून आपली प्रगती करण्याची संधी आहे, हे लक्षात घ्यायला पाहिजे. तशी सकारात्मक ऊर्जा व प्रोत्साहन मुलांना दिले गेले पाहिजे. त्यासाठी आधी आपली मनोधारणा, आपले विचार तपासून पाहिले पाहिजेत.
संकलन……✍️👇
शिवश्री गोरख मोरजकर
शिक्षणतज्ञ