संस्कृत व्याकरणानुसार संस्कृत शब्द श्री चे तीन अर्थ आहेत, शोभा, लक्ष्मी आणि कांती. श्री शब्दाचा सर्वप्रथम उल्लेख ऋग्वेदात झाला. जे लोक विकास करतात आणि त्यांच्याकडे नवीन शोध घेण्याची दूरदृष्टी असते अशा लोकांना संबोधन करण्यासाठी श्री शब्दाचा वापर केला जातो. बऱ्याच पुस्तकात श्री म्हणजे शक्ती म्हणून संबोधले जाते. ऋषीमुनी, राजा, नगर शेठ, वैज्ञानिक, अध्यात्मिक प्रगती झालेले तत्ववेत्ते, महान शिल्पी इत्यादी महापुरुषांना आदराने संबोधन करण्यासाठी त्यांच्या नावाबरोबर श्री लावले जाते. अयोध्येचा राजा राम यांना आपण जेव्हा श्रीराम म्हणून संबोधन करतो तेव्हा ईश्वरत्व चा बोध होतो. याच प्रमाणे श्रीकृष्ण, श्रीविष्णु, श्री लक्ष्मी, ही नावे उच्चारण करताना त्यांच्या उत्कृष्ट व्यक्तीमत्वाचा, महान कार्यांचा, अलौकिक शक्तीचा बोध होतो. आपल्या पुरुषार्थ द्वारे आणि स्वपराक्रमाने ऐश्वर्य प्राप्त करणारे महान लोक श्रीमान होतात. परमात्म्याला आपण अनंत श्री अर्थात परम शक्तिशाली समजतो. पुरातन काळात पुरुषार्थ न करणाऱ्या लोकांना श्रीमान म्हणवून घेण्याचा अधिकार नव्हता. श्री अशी अद्भुत दैवी शक्ती आहे जी सुर असुर मानव किन्नर सर्व कठोर तप करून प्राप्त करू शकतात. श्री लक्ष्मी स्वरूपात स्त्रियांमध्ये वास करते, ज्या समाजात स्रियांना आदर दिला जातो, तिथे शोभा, कांती आणि ऐश्वर्य वास करते.
राजाधिराज छत्रपती श्री शिवाजी उत्कृष्ट योद्धा प्रजा हितकारी, गरिबांचे कैवारी, दयाळू, विजयनगर साम्राज्याच्या पतनानंतर ज्यांनी पुन्हा आपल्या पुरुषार्थाच्या बळावर धर्मराज्य, हिंदू साम्राज्य स्थापन केले असे महापराक्रमी राजे, त्यांच्या राज्याला ‘हे श्रींचे राज्य’ संबोधून करणे हा श्रीची स्थापना करण्यासाठी त्यांच्या अथक परिश्रमांना दिलेला छोटासा सन्मान आहे. शिवाजी राजांना इतिहास लिहिणार्यांनी अनेक नावांनी संबोधन केले आहे त्यांना लोक प्रेमाने राजे, शिवबा, शिवराय, शिव, इत्यादी नावाने संबोधन करतात
आपल्या देशाच्या इतिहासात, छत्रपती श्री शिवाजी महाराजांचे नाव त्यांच्या महान कार्यामुळे सदैव अमर राहील. शिवाजी महाराजांना श्री शक्ती सिद्ध होती म्हणूनच ते विदेशी आक्रमण करणाऱ्या क्रूर आणि निर्दयी लुटारू लोकांच्या समोर जिद्दीने उभे राहून त्यांना पराजित केले आणि मराठा साम्राज्याची स्थापना करून मोठा पराक्रम केला. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून, त्यांनी स्थापन केलेले ‘हे श्रींचे राज्य’ आपल्या देशात आजही विकासाच्या पथावर अग्रेसर आहे, सर्वश्रेष्ठ आहे.
प्रत्येक मराठी माणसाच्या मनात मराठी ‘अस्मितेच्या’ रूपात सदैव राहणारे, सर्वांचे लाडके राजे शिवराय यांना शतशत नमन.
जय जिजाऊ जय शिवाजी.