‘जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन : 40 सेकंदाला एक व्यक्ती करते आत्महत्या;
वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) नुसार जगात दर 40 सेकंदाला एक व्यक्ती आत्महत्या करते.
www.janvicharnews.com
अध्यात्मिक आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून मानवी जीवन महत्वपूर्ण मानले जाते. माणूस सर्व अपेक्षा घेऊनच जन्माला येतो. आयुष्याच्या एखाद्या टप्प्यावर निराशेची लाट मनावर अशी विध्वंस करते की, तो आपले अनमोल आयुष्य स्वतःच्या हातून संपवतो. सध्या जगभरात आत्महत्येचा ट्रेंड वाढतो आहे. यावर प्रतिबंध घालण्यासाठी प्रतिवर्षी 10 सप्टेंबर रोजी ‘जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन’ आयोजित केला जातो. हा दिवस साजरा करण्यामागचे प्रमुख उद्दिष्ट लोकांना आत्महत्या करण्यापासून परावृत्त करणे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) यांच्या सर्वेनुसार जगात दर 40 सेकंदाला एक व्यक्ती आत्महत्या करते.

www.janvicharnews.com
आपल्या भारतात 2021 मध्ये देशात 1 लाख 64 हजार 33 जणांनी केल्या आत्महत्या –
भारतातील आत्महत्यांची संख्याही चिंताजनक आहे. काही दिवसांपूर्वी, नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरो (NCRB) ने 2021 मध्ये भारतातील आत्महत्या प्रकरणां बाबत अहवाल प्रसिद्ध केला होता. 2021 मध्ये देशात 1,64,033 लोकांनी आत्महत्या केल्या आहेत. अहवालानुसार 2020 च्या तुलनेत 2021 मध्ये आत्महत्या 7.2 टक्क्यांनी वाढल्या आहेत.

www.janvicharnews.com
NCRB नुसार,आत्महत्या करण्यामागची कारणे- व्यावसायिक किंवा करिअरशी संबंधित समस्या, एकटेपणाची भावना, अत्याचार, हिंसाचार, कौटुंबिक समस्या, मानसिक विकार, दारूचे व्यसन, आर्थिक नुकसान, शासकीय धोरणांची दिरंगाई, काही जुनाट आजार ही आत्महत्यांच्या घटनांमागील प्रमुख कारणे आहेत.
www.janvicharnews.com
स्पर्धेच्या या युगात तणाव शिगेला पोहोचला आहे. यातून निर्माण होणारे नकारात्मक विचार कधी कधी इतके प्रबळ होतात की लोक जीवन संपवण्याचा धोकादायक मार्ग निवडतात. जेव्हा जेव्हा अशी अस्वस्थ परिस्थिती जाणवते तेव्हा कुटुंबासह किंवा मित्रांसह वेळ घालवला पाहिजे, जे गंभीर परिस्थितीत मानसिक आधार देऊ शकतात. जर कधी जास्त ताण किंवा मानसिक आजार जाणवत असेल तर लगेच मानसोपचार तज्ज्ञांना भेटा आणि तुमची समस्या तात्काळ सोडवा .

www.janvicharnews.com