जिजाऊ महाविद्यालयात अण्णाभाऊ साठे यांची जयंती आणि लोकमान्य टिळकांची पुण्यतिथी साजरी

परंडा- १ ऑगस्ट २०२३ रोजी जिजाऊ महाविद्यालयात लोकशाहीर आण्णाभाऊ साठे  यांची जयंती आणि लोकमान्य गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. या कार्यक्रमास प्रमुख वक्ते,महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एम जी शिंदे यांनी या दोन्ही महापुरुषांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला. अण्णाभाऊ साठे  हे एक मराठी समाजसुधारक, लोककवी आणि लेखक होते. त्यांचे लेखन सामाजिक आणि राजकीयदृष्ट्या कृतिशीलतेवर आधारलेले होते. साठे हे मार्क्सवादी-आंबेडकरवादी प्रवृत्तीचे होते, सुरुवातीला त्यांच्यावर साम्यवादाचा प्रभाव होता पण नंतर ते आंबेडकरवादी झाले. दलित साहित्याचे संस्थापक म्हणून त्यांना श्रेय दिले जाते. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत देखील त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती.अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य हे परिवर्तनाला दिशा व चालना देणारे ठरले आहे. महाराष्ट्राच्या एकूणच जडणघडणीत आणि परिवर्तनात या साहित्याचे योगदान हे महत्त्वपूर्ण मानले जाते.

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक हे थोर देशभक्त, काँग्रेसच्या कट्टरवादी विचारसरणीचे प्रवर्तक, थोर लेखक, विचारवंत , समाजसुधारक आणि स्वातंत्र्यसैनिक होते. भारतीयांची स्थिती सुधारण्यासाठी आणि लोकांना जागृत करण्यासाठी त्यांनी एकीकडे मासिके काढली, दुसरीकडे देशवासीयांच्या प्रबोधनासाठी त्यांनी स्वतः शिक्षण केंद्रे स्थापन केली, तसेच देशवासीयांना एकतेच्या धाग्यात बांधले, ‘गणेशोत्सव‘ आणि ‘शिवाजी‘ जयंतीसारखे सामाजिक कार्यक्रम सुरू केले. गंगाधर टिळकांनी तिन्ही बाजूंनी इंग्रजांवर मोर्चेबांधणी करून इंग्रजांच्या नाकी नऊ आणले. आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत ते इंग्रजांविरुद्ध लढत राहिले. प्राचार्य डॉ. शिंदे सरांनी या दोन्ही महापुरुषांच्या कार्याचा सखोल असा उलघडा केला. या कार्यक्रमाचे  अध्यक्षस्थान प्रा.खारे सर यांनी भूषविले त्याच बरोबर सूत्रसंचालन अमोल जरांडे आणि  आभार प्रदर्शन पूजा बनसोडे यांनी केले. या कार्यक्रमास महाविद्यालयाचे कर्मचारी योगेश वाघमोडे, प्राजक्ता गोंधळी तसेच विद्यार्थी उपस्थित होते 

Scroll to Top