द्राक्ष पिक व्यवस्थापन

द्राक्ष पिक व्यवस्थापन
श्री.सतिश भोसले

नमस्कार द्राक्ष बागायतदार बंधुनो,

सध्या गेली दोन चार दिवस काही भागात ढगाळ वातावरण आहे, अनेक बागा या डोळे फुटण्याच्या तर काही फ्लॉवरिंग स्टेजमध्ये आहेत. छाटणी ते डोळे फुटेपर्यंत जर पाऊस किंवा ढगाळ वातावरण असल्यास वेलिमध्ये जिब्रेलिन्सचे प्रमाण जास्त होऊन वेलिचा वाढीचा वेग वाढला जातो परिणामी बागेत घड जिरण्याची समस्या निर्माण होऊ शकते. अश्या वेळी वेलीत सायटोकायनिनचे (CPPU किंवा 6 BA) प्रमाण वाढवुन ही समस्या दूर करता येईल. (CPPU चा वापर गरजेनुसार करावा जसे एका स्प्रे मध्ये घड जिरणे थांबल्यासारखे वाटत असल्यास एकच स्प्रे द्यावा, एका स्प्रे न पाहिजे तेवढा फरक न पडल्यास दुसरा स्प्रे परत द्यावा) पाऊस झाला असल्यास ६ बीए (१० पीपीएम)ची फवारणी करावी. यामुळे फुटत असलेल्या डोळ्यामध्ये संजीवकांचे संतुलन राहील. डोळा फुटत असताना पोटॅश १ ते १.५ ग्रॅम प्रतिलिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. वेलीस सुरवातीच्या काळात संतुलित अन्नद्रव्यांची महत्वाची गरज असते. असंतुलित अन्नद्रव्यांमुळे व वातावरणीय बदलामुळे फ्लॉवरिंग स्टेजमध्ये गळ आणि कुज यासारख्या समस्या दिसून येत असतात. गळ- कुज होऊ नये यासाठी काही महत्वाच्या सूचना:-

ज्या बागेत फळछाटणी होऊन आता प्रिब्लुम अवस्था आहे, अशा बागेत जर कॅनॉपी वाढली असेल तर फळकुजीची समस्या जास्त प्रमाणात दिसून येईल. वाढत्या आर्द्रतेमध्ये डाउनी मिल्ड्युचा प्रादुर्भाव दिसतो. लवकर फळछाटणी झालेल्या बागेमध्ये प्रिब्लुम अवस्थेत जेव्हा पाऊस पडला असेल आणि अचानक आर्द्रता वाढली असल्यास (तापमान ३५ अंश सेल्सिअसपर्यंत व आर्द्रता ८० टक्‍यांच्या पुढे) जिवाणूजन्य करपा(झॅन्थोमोनस) रोगाची समस्या दिसेल.

नाजूक घडावर जेव्हा पाऊस पडतो, त्या वेळी फुलाचा दांडा सडतो, त्यानंतर कुज सुरू होते. या वातावरणात बागेमध्ये करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसू शकतो. या कालावधीमध्ये आपण बुरशीनाशकांची फवारणी करत असतो. त्यामुळेसुद्धा पान तसेच घडावर ताण दिसतो. याचसोबत, वेलीवर या विपरित परिस्थितीमुळे ताण बसतो. पुन्हा कुज होण्यास किंवा घड जळल्यासारखा दिसण्यास सुरवात होते. कोवळ्या फुटींवर पावसाळी वातावरणात अँथ्रॅक्‍नोजचा प्रादुर्भाव दिसून येतो.

उपाययोजना :

सुरवातीच्या काळात करपा नियंत्रणाकरिता कृषी तज्ज्ञांच्या सल्यानेच फवारणीचे उपाय करावेत.

जर बागेत जास्त प्रमाणात आर्द्रता असल्यास ट्रायकोडर्मा ५ मि.लि. प्रतिलिटर पाण्यात मिसळून फवारणी करता येईल; परंतु कॉपरयुक्त बुरशीनाशकाची फवारणी यावेळी टाळावी. जैविक नियंत्रणाचा वापर केल्या जातो, तेव्हा बागेत कॅनॉपीवर २ ते ३ फवारण्या लागोपाठ घ्याव्यात. जैविक बुरशीनाशक जमिनीतूनसुद्धा ठिबक सिंचनाद्वारे उपलब्ध केल्यास त्याचे परिणाम चांगले मिळतील.

कॅनॉपी मोकळी राहील याची काळजी घ्यावी. कारण बागेमध्ये रोगांची मुख्य समस्या म्हणजे दाट कॅनॉपी हेच असते. क्यानोपी नियोजन अगोदरच ढगाळ वातावरण आहे. अश्या परिस्थितीत पानांना पुरेसा सुर्यप्रकाश मिळत नाहीये त्यामुळे अमोनिकल नत्राचे प्रमाण वाढून जास्त गळ कुज होते. त्यामुळे कानोपी नियाजन करणे अत्यंत महत्वाचे आहे. फेल असलेले शूट काढून टाकाव्यात. लागवडीनुसार योग्य तेवढ्याच शूट ठेवाव्यात. मोकळ्या कानोपीमध्ये सूर्यप्रकाश पण एकसारखा मिळतो आणि फवारा पण एकसारखा बसतो…!!!✍

🙏🙏🙏🙏🙏 शेतकरी हितार्थ 🙏🙏🙏🙏🙏

—-

🦚🌹🦚 !! अन्नदाता सुखी भव: !!🦚🌹🦚

काळजी घ्या…आपला जिव्हाळा कायम राहो

🙏विचार बदला! जीवन बदलेल!!

Scroll to Top