निमलष्करी दलांमधील करिअर

निमलष्करी सैन्यदले भूदल, वायुदल आणि नौदल या मुख्य सैन्यदलांना पूरक असे कार्य करतात. निमलष्करी दलांपैकी केंद्रीय गृह मंत्रालयांतर्गत काम करणाऱ्या दलाना केंद्रीय सशस्त्र पोलीस दले असे म्हणतात. यात बॉर्डर सिक्युरिटी फोर्स (BSF). सशस्त्र सीमा बल (SSB) इंडो-तिबेट बॉर्डर पोलीस (ITBP) आसाम रायफल (AR). सेंट्रल इंडस्ट्रिअल सिक्युरिटी फोर्स (CISF), सेंट्रल रिझव्हें पोलीस फोर्स (CRPF), नॅशनल सिक्युरिटी गार्ड (NSG) यांचा समावेश होतो. तर तटरक्षक दल (Indian Coast Guard) भारतीय नौदलाच्या नियंत्रणाखाली कार्य करते. निमलष्करी दले लष्कराच्या मुख्य विभागांना पूरक कार्य करतात देशांतर्गत सुव्यवस्था निर्माण करणे. नागरी प्रशासनास मदत करून स्थिरता निर्माण करणे, समुद्रकिनाऱ्याचे रक्षण करणे, शांतताकाळात सोमाचे रक्षण करणे, युद्धकाळात महत्त्वाचे रस्ते व पूल आणि महत्त्वाची ठिकाणे यांचे रक्षण करणे इत्यादी कामे निमलष्करी दलाकडून पार पाडली जातात.

भरतीबाबतची जाहिरात

निमलष्करी दलामधील विविध पदे ही त्यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रतेनुसार (10 वी ते पदवी) भरली जातात. यापैकी केद्रीयस्तरावर भरल्या जाणाऱ्या पदांची त्याबाबतची सविस्तर जाहिरात Employment News या वृत्तपत्रात, तर अन्य पदासाठीच्या जाहिराती महत्त्वाच्या राज्यस्तरीय वृत्तपत्रामध्ये आणि संबंधित दलाच्या वेबसाइट्सवर प्रसिद्ध केल्या जातात.

निमलष्करी दलांचा थोडक्यात परिचय आणि त्यांचे कार्य

1. बॉर्डर सिक्युरिटी फोर्स- या सैन्यदलावर केंद्रीय गृहखात्याचे नियंत्रण असते. भूदलाप्रमाणेच या सुरक्षा दलाच्या अनेक तुकड्या (बटालियन्स) आहेत. हे दल शांतताकाळात प्रामुख्याने भारत-पाकिस्तान व भारत-बांग्लादेश सीमा रक्षणाचे कार्य करते.

2. सशस्त्र सीमा बल- या सैन्यदलावर केंद्रीय गृहखात्याचे नियंत्रण असते. हे दल भारत-नेपाळ आणि भारत-भूतान या सीमांच्या रक्षणाये कार्य करते.

3. इंडो-तिबेट बॉर्डर- पोलीस भारताच्या उत्तर सीमेच्या रक्षणासाठी या दलाची स्थापना करण्यात आली आहे. हे दल गृहमंत्रालयाच्या नियंत्रणाखाली काम करते. या दलातील सैनिक काराकोरम पर्वतापासून जम्मू-काश्मीरमधील लाख, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडच्या पर्वतीय सीमा प्रदेशात कार्य करतात.

4. आसाम रायफल्स:-आसाम रायफल्स हे सर्वात जुने (स्थापना 1835) निमलष्करी दल आहे. या दलाने पहिल्या व दुसऱ्या महायुद्धात चांगली कामगिरी केली होती. या दलातील सैनिक भारताच्या ईशान्य सीमेची सुरक्षा करणे. ईशान्य भारतातील राज्यामधील बंडखोरीविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करणे, नागरी असंतोष नियंत्रित करून नागरी प्रशासनास मदत करणे. ईशान्येकडील राज्यामध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्यास मदत करणे इत्यादी कार्य करतात.

5. सेंट्रल इंडस्ट्रिअल सिक्युरिटी फोर्स-  हे दल सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांना संरक्षण देण्याचे कार्य करते. उदा. अणुऊर्जा केंद्र, अंतराळ संशोधन केंद्र, विमानतळ महत्त्वाची बंदरे, ऊर्जाप्रकल्प, सरकारच्या संवेदनशील इमारती, ऐतिहासिक वारसास्थळे इत्यादी.

6. सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स- हे केंद्रीय गृहमंत्रालयाच्या नियंत्रणाखाली काम करणारे सर्वांत मोठे निमलष्करी दल आहे. केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या एकूण 240 बटालियन्स असून त्यात सहा महिला बटालियन्स आहेत. त्या देशाच्या विविध भागांत कार्यरत आहेत.

कार्ये- देशांतर्गत अस्थिरता निर्माण झाल्यास किवा राज्यात व केंद्रशासित प्रदेशात कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या कामात गरजेनुसार कार्य करणे, नैसर्गिक आपत्तीच्या काळात नागरिकांना मदत करणे, देशविरोधी कारवायांविरुद्ध संघर्ष करून त्यांचा बीमोड करणे, युद्धकाळात संरक्षा दलाच्या मदतीकरता पूरक संरक्षणाचे काम करणे इत्यादी.

याच धर्तीवर राज्यपातळीवर राज्य राखीव पोलीस दल कार्य करते राज्य राखीव पोलीस दल हे देशातील प्रत्येक राज्यातील गृहमंत्रालयाच्या नियंत्रणाखाली सामान्य पोलीस दला व्यतिरिक्तचे सशस्त्र पोलीस दल आहे काही राज्यात या दलाला प्रांतीय रक्षक दल या नावाने ओळखले जाते. राज्यात कायमस्वरूपी छावण्यामधून त्याचे प्रशिक्षण सुरू असते.

कार्य- युद्धकाळात त्याना संरक्षणपूरक कार्य करावी लागतात. उपद्रवी व समाजकंटक गटाचा बंदोबस्त करणे, राज्यातील पोलिसांना कायदा व सुव्यवस्था ठी मदत करणे, समाजघातकी नक्षलवादी यासारख्या सशस्त्र टोळयाचा बंदोबस्त करणं इत्यादी,

7.नॅशनल सिक्युरिटी गार्ड- दहशतवादविरोधी कारवायांसाठी खास प्रशिक्षण घेतलेले दल विविध दलामधील निवडक अधिकाऱ्याना विशेष प्रशिक्षण देऊन या दलात डेप्युटेशनवर नियुक्त केले जाते.

8. तटरक्षक दलः तटरक्षक दल म्हणजेच कोस्ट गार्ड हे सागरी सुरक्षा सांभाळणारे नौसेना, मासेमारी व महसूल मंत्रालयाशी संलग्न कार्ये करणारे बहुकर्मी निमलष्करी दल आहे. या दलाचा कारभार संरक्षण मंत्रालयाच्या नियंत्रणाखाली चालतो. या दलातील सैनिक सागरी तस्करी व चाचेगिरीवर नियंत्रण ठेवणे, भारतीय मत्स्यव्यवसायास संरक्षण देणे व मदत करणे. भारताच्या समुद्रकिनाऱ्यावर व सागरी पर्यावरणावर नियंत्रण ठेवणे, सागरी संपत्तीचे रक्षण करणे, सागरी विज्ञान व संशोधनासाठी उपयुक्त माहितीचे संकलन करणे, इत्यादी कार्य करतात.

वरीलपैकी सीमा सुरक्षा दलामध्ये (BSF) महिला शिपाई आणि अधिकारी अशा दोन्ही पदावर काम करतात, तर अन्य दलामध्ये फक्त अधिकारी पदांवरच महिला कार्य करतात.

संरक्षण आणि नागरी सुव्यवस्थेत साहाय्य करणारी अन्य दले;

  1. गृहरक्षक दल (होमगार्ड): होमगार्ड हे एक स्वयंसेवी संघटन आहे केंद्रीय गृहमंत्रालयाच्या नियंत्रणाखाली विविध राज्यांत आणि केंद्रशासित प्रदेशात हे दल कार्य करते. होमगार्ड ही नागरी व्यवस्थापनाला मदत करणारी संघटना आहे. ही संघटना जिल्हा तालुका व ग्रामीणस्तरावर कार्य करते. त्या-त्या विभागातून होमगार्डची भरती केली जाते. यामध्ये पुरुष व महिला स्वयंसेवकांचा समावेश असतो. त्याची शहरी व ग्रामीण अशी वर्गवारी केली जाते. त्यानुसार त्यांना सलग 10 ते 42 दिवसाचे प्राथमिक प्रशिक्षण दिले जाते. तसेच, साप्ताहिक कवायत आणि आठ दिवसांचे उजळणी शिबिर पूर्ण करावे लागते.

2. नागरी संरक्षण: शत्रूच्या हवाई हल्ल्यापासून आपल्या देशातील जीवित व मालमत्तेचे संरक्षण करण्यासाठी बचाव कार्य करणाऱ्या संघटनेला नागरी संरक्षण संघटना असे म्हणतात. नागरी संरक्षण सेवेची रचना केंद्र, राज्य व जिल्हा अशी त्रिस्तरीय असते, त्या- त्या पातळीवर त्याचे कार्य सुरू असते. यात संरक्षण सेवेतील निवृत्त अधिकारी, सार्वजनिक संघटनेचे नेते, औद्योगिक क्षेत्रातील अधिकारी, पोस्ट, टेलिग्राफ सेवेतील अधिकारी, डॉक्टर्स, इंजिनीअर्स, तंत्रज्ञ यांचा समावेश असतो.

Scroll to Top