महेंद्र कुंभारे,
www.janvicharnews.com
सध्या देशात जे घडत आहे ते महाभयंकर आहे. जगातल्या लोकसंख्येच्या मानाने सर्वात मोठ्या देशातील लोकशाहीच धोक्यात आलेली आहे. लोकशाही टिकवायची असेल तर विरोधीपक्ष जिवंत असायलाच हवा. आणि इथे विरोधीपक्षासह सर्व प्रादेशिक पक्षच संपवण्याचा विडा केंद्रातील भाजप सरकारने उचलला आहे. सर्व शासकीय तपास यंत्रणा ED, CBI, Income Tax विभाग तसेच सर्वोच्च न्यायालय, केंद्रीय निवडणूक आयोग, रिझर्व्ह बँक अशा देशाचा पाया असलेल्या स्वतंत्र यंत्रणांचा बेकायदेशीर वापर होताना दिसत आहे. याला वेळीच पायबंद घातला गेला नाही तर, भारत देशाची लोकशाही धोक्यात येणार आहे.

www.janvicharnews.com
नुकतेच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी विधिमंडळात जे भाष्य केले आहे ते देशाची चिंता वाढवणारे आहे. केंद्रातील भाजप सरकार आम आदमी पार्टीचे आमदार फोडण्यासाठी साम, दाम, दंड, भेदाचा वापर करीत आहे असे म्हणाले. २० ते २५ कोटी रुपयांची लालच देऊन आमदारांना भाजप मध्ये येण्याची आँफर दिली जात आहे. नाही आल्यास तुमच्या मागे ED चा भूंगा लावण्याची धमकीही दिली जात आहे. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांना आप पक्ष सोडून भाजप मध्ये मुख्यमंत्री करण्याची आँफर देण्यात आली. शिवाय तुमच्या विरोधात असलेल्या सर्व चौकशी बंद करण्याचे सांगण्यात आले. मात्र, त्यांनी या सर्व आँफर धुडकविल्याने त्यांना जेलमध्ये टाकण्यात आले. ज्या आप सरकारने दिल्लीला कर्जमुक्त केले, शिक्षण व्यवस्था सुधरविली, गरिबांना वीज आणि बस सुविधा मोफत दिली अशा मंत्र्यांना जबरदस्तीने जेल मध्ये टाकून भाजप काय हासिल करु पाहत आहे?
भाजप आता केवळ काँग्रेसच नाही तर प्रादेशिक पक्षांनाही संपवणार…. https://janvicharnews.com/489/

www.janvicharnews.com
महाराष्ट्रात सध्या जे राजकारण सुरु आहे ते अत्यंत घृणास्पद आणि किळसवाणे आहे. ६० वर्षाच्या शिवसेनेचे ४० आमदार ५० खोके देऊन फोडले. काही आमदारांना आरोपातून तात्काळ क्लीनिंग चिट दिली. काहींच्या चौकशा बंद केल्या. प्रताप सरनाईक, यामिनी जाधव, भावना गवळी ही जिवंत उदाहरणे आहेत. गद्दारी केलेल्या आमदारांची हिंदुत्वाचा मुद्दा, राष्ट्रवादीशी फारकत घेणे, निधी न मिळणे आणि पक्षप्रमुख भेटत नाहीत ही सर्व कारणे फालतू आहेत. खरे कारण पैसा आणि चौकशा बंद होणे हेच आहेत. आणि याला खतपाणी घालण्याचे काम भाजपनेच केले आहे हे सूर्यप्रकाशा इतके स्वच्छ आहे. भाजपने आघाडी सरकार जरी पाडले असले तरी लोकांचा विश्वास गमावलेला आहे. महाराष्ट्रातील सत्ता हातात घेऊन मुंबई ताब्यात घेतल्यानंतरचे षडयंत्र काय आहे हे आता लोकांच्या लक्षात येऊ लागले आहे. म्हणूनच कट्टर आंबेडकरवादी सषमा अंधेरे आणि संभाजी ब्रिगेड सारखी संघटना शिवसेनेच्या सोबत गेली आहे. आणि ही पोस्ट लिहित असतानाच विश्व हिंदु परिषद आणि बजरंग दलचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या हातून आजच शिवबंधन बांधून घेतले आहे. शिवाय शिवसेनेचे हिंदुत्वच खरे हिंदुत्व आहे असा संघ आणि भाजपला घरचा आहेर दिलेला आहे.
www.janvicharnews.com
अशाच प्रकारे नितिशकुमारच्या बिहारचे सरकार, ममता बॅनर्जीच्या पश्चिम बंगालचे सरकार खोक्यांच्या जीवावर पाडण्याचा प्रयत्न केंद्रातील भाजप सरकार करत आहे. ED चे अधिकारी तर बंगाल मध्ये तळ ठोकून बसले आहेत. तर बिहारकडे नुकतेच रवाना झाले आहेत. कारण, महाराष्ट्रात भाजप – शिंदे सरकार बसल्यामुळे इथले त्यांचे काम संपुष्टात आले असून बहुधा कार्यालयही बंद करावे लागणार आहे. किरीट सोमय्या आणि मोहित कंबोज सारखे परप्रांतीय महाराष्ट्राच्या मुळावर उठले असून मराठी नेता कसा भ्रष्टाचारी आहे हे दाखविण्याचा ते प्रयत्न करीत आहेत. आणि आपलेच लोकं त्यांना साथ देत आहेत हेच दुर्दैव आहे. भ्रष्टाचाराला शिक्षा झाली पाहिजे . मात्र, भ्रष्टाचारी काय फक्त भाजप सोडून विरोधी पक्षातच आहेत का? भाजपचे सर्व नेते धुतल्या तांदळासारखे स्वच्छ आहेत का? शिवाय इतर पक्षातले भ्रष्टाचारी भाजप मध्ये आल्यावर शुध्द कसे होतात? हाच प्रश्न जनतेला पडलेला आहे. एकूणच दुसऱ्या पक्षातील आमदार फोडून राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्ष नष्ट करण्याचे कट कारस्थान भाजप करीत आहे. भाजपचेच राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी म्हटलेच आहे कि आम्हाला विरोध करणारा पक्षच ठेवायचा नाही आहे. म्हणजेच यांना भारत देशातील लोकशाहीच संपुष्टात आणायची आहे. म्हणून लोक हो वेळीच जागे व्हा, संविधानामुळे आपण एकसंघ आहोत, आपली घटना जर बदलली तर पुन्हा एकदा देशात चातुर्वर्ण्य पध्दत लागू होईल. यासाठी इतिहासात डोकावून पहा. जो समाज आपला इतिहास विसरतो त्या समाजाची प्रगती कधीच होऊ शकत नाही आणि आपण सध्या त्याच वाटेवर आहोत हे लक्षात असू द्या! ✍
️——————————————आपली प्रतिक्रिया नोंदवा ………………………………………………………………………….