छञपती शिवाजी महाराज आणि छञपती संभाजी महाराज यांचे आर एस एस ला आवश्यक असणारे ब्राम्हणीकरण करण्यास भिडे यशस्वी झाला आणि त्याने आरएसएस ला लागणाऱ्या बहुजन मराठा समाजातील तरुणांचे ब्राम्हणीकरण करून त्यांची संघटना केली आणि त्या संघटनेचे नाव “शिवप्रतिष्ठान” ठेवले. शिवप्रतिष्ठान नावाने तरुणांच त्याने केलेलं संघटन आज सर्वत्र पसरलेले आहे, छञपती शिवाजी महाराज आणि छञपती संभाजी महाराज यांचे ब्राम्हणीकरण करून त्यांच्या ब्राह्मणीकरणावर निष्ठा म्हणजे देशप्रेम अशा अविचारांची पेरणी भिडेने यशस्वी केली.
पश्चिम महाराष्ट्र हे बहुजन विचारसरणीचं माहेरघर; क्रांतिसिंह नाना पाटील, संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मख्यमंत्री यशवंतराव चव्हाण, माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील, लोकनेते राजारामबापू पाटील, क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी, शिगाव येथील क्रांतिवीर रंगरावदादा पाटील, क्रांतिवीर जी.डी. बापू लाड, पांडुमास्तर, बोर्डे गुरुजी अशा कितीतरी ज्ञात अज्ञातांची ही कर्मभूमी ही आरएसएस च्या दावणीला बांधली जाणार नाही हे आरएसएस ला माहीत होते, मग या बहुजन समाजातील लोकांचं ब्राम्हणीकरण कसं करायचं हा त्यांच्या पुढं प्रश्न होता आणि या प्रश्नाचं उत्तर कपटी ब्राम्हणांना मिळालं. बहुजन समाजाचे ब्राम्हणीकरण करायचे असेल तर छञपती शिवाजी महाराज आणि छञपती संभाजी महाराज यांचं ब्राम्हणीकरण केलं पाहिजे हे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी बहुजन मराठा समाजाचे श्रद्धा्थान असणाऱ्या छ्त्रपती शिवाजी महाराज आणि छञपती संभाजी महाराज यांच्या चरित्राच ब्राम्हणीकरण केलं. त्यासाठी बाबा पुरंदरेकडून ” राजा शिवछत्रपती” हा शिवकुळाची बदनामी करणारा ब्राम्हणीवर्चस्व बहुजन मराठा समाजावर वर्चस्व प्रस्थापित करणारा ग्रंथ लिहून घेतला. आणि हा ग्रंथ बहुजन समाजाच्या प्रत्येक घरातील देव घरापर्यंत नेहण्याचे पाप भिडेने केले.
आणि आज……. .
क्रमशः ……
विजय पाटील.
शिवप्रबोधिनी कोल्हापूर.