भिडे पुराण

भाग: ६.

भिडेला त्याच्या विध्वंसक कामात यश का येते?

बहुजन मराठा समाजात छञपती शिवाजी महाराज, छञपती संभाजी महाराज आणि मराठ्यांच्या एकूणच इतिहासाबद्दल अतोनात प्रेम आहे. बहुजन समाजाचा एक गुण आहे आहे तो सगुण आहे की दुर्गुण हे ज्याचे त्याने ठरवावे, तो गुण असा की आपला बहुजन मराठा समाज हा विरक्त साधू संतावर खूप श्रध्दा, निष्ठा आणि विश्वास ठेवतो. हा श्रद्धाळू बहुजन मराठा समाज कष्टकरी, कष्टाळू लोकांपेक्षा अशा भिक्षुक लोकांना खूप महत्त्व देतो.

भिडे बाबत असेच घडले आहे. तो पायात चप्पल घालत नाही, त्याला रहायला घर नाही, जेवण मिळालं तर जेवतो नाहीतर उपावाशी राहतो, तहान लागली तर पाणी प्यायला सुध्दा त्याच्याकडे पेला नाही तो ओंजळीने पाणी पितो, एकच धोतर आणि एकच कुर्ता त्याच्या जवळ आहे, तेच कपडे ती घालतो, तेच धोतर तो पांघरून म्हणून वापरतो, आणि तेच धुतो आणि पुन्हा तेच वापरतो. एव्हढ्या हालाकीच्या परिस्थीत असून ही तो छञपती शिवाजी महाराज आणि छञपती संभाजी महाराज यांच्यावर समाजात निष्ठा निर्माण व्हावी म्हणून तो रात्रंदिवस अखंड पने इतिहास सांगत असतो. मराठी, हिंदी, इंग्रजी आणि संस्कृत भाषेवर त्याचे प्रभुत्व आहे, एव्हढा हुशार, विद्वान, अफाट बुध्दी आणि गुणवान असणाऱ्या भिडेने फक्त छञपती शिवाजी महाराज आणि छञपती संभाजी महाराज या नावावर लोकांची निष्ठा निर्माण व्हावी म्हणून आपल्या आयुष्याची माती केली, अशी बहुजनसमाजात त्याच्या बद्दलचे मत आहे.

शिवप्रतिष्ठान वाढत असताना तो लोकांच्या आणि तरुणांच्या मनात असा विश्वास निर्माण करायचा की आपण करीत असलेले शिवप्रतिष्ठानचे काम हे राजकारण विरहित आहे, राजकारणाला मी विष्ठेसमान मानतो. असे सांगून त्याने या क्रांतिकारकांच्या भूमीत, नाना पाटलांच्या भूमीत, वसंतदादा पाटील आणि राजारामबापू पाटलांच्या कर्मभूमीत खोटे बोलून ब्राम्हण प्रणित शिवप्रतिष्ठानची विषवल्ली लाऊन ब्राम्हण प्रणित भाजप पक्षाची यशस्वी वाटचाल सुरू केली.

शिवप्रतिष्ठानची विषवल्ली कशाप्रकारे महाराष्ट्रभर फोफावली आणि त्यात भिडे ला यश का आले?

हे पुढील भागात पाहू.

क्रमशः.

विजय पाटील.

शिवप्रबोधिनी, कोल्हापूर

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top