आजचा पालक…..आजचा विद्यार्थी…..
भाग :- ३

आजच्या या मोबाईल व इंटरनेटच्या जमान्यात खेळ, व्यायाम, भटकंती आणि दर्जेदार वाचन न केल्यामुळे मुलांमध्ये मानसिक कमतरता जाणवते. मित्र फक्त WhatsApp , face बुक वर भेटतात. प्रत्यक्ष भेट नाही. सुख-दुःखाची देवाण- घेवाण नाही आणि मित्राचा- मैत्रिणीचा मानसिक आधार नाही. आणि त्यामुळे team work कळत नाही. दिलखुलास हसणे आणि ओक्साबोक्शी रडणे मानसिक आरोग्यासाठी चांगले असते. ह्या दोन्ही क्रिया मुलांना करता येत नाहीत. पालकांच्या आजच्या भुमिकेमुळे मुलांना संघर्ष माहीत होत नाही. त्यामुळे आपोआपच, जरा मनाविरुद्ध घडलं की लहान मुले-मुली आत्महत्या करतात. बरीच एकुलती एक मुले दुसर्याशी जमवून घेण्याची सवय नसल्यामुळे पुढे लग्न झाल्यावर वर्षभरात घटस्फोट घेतात. ज्या मुलांना बहीण नसते, चांगली मैत्रीण नसते त्यांचा स्त्रियांकडे पाहण्याचा दृष्टिकोन संकुचित बनतो. ह्या उणिवांचा शिक्षणात विचार केलेलाच नाही. भारतीय शिक्षण पद्धत सर्वांगीण नाही हे शिक्षण तज्ज्ञ सांगत आले आहेत. एखादी स्त्री गरोदर राहिली तर जन्माला येणाऱ्या जीवाच्या admission ची तयारी सुरु होते. कृष्णाला जन्मण्याआधी मारायची तयारी मामाने केली होती. आता मुल जन्माला येण्याआधी त्याला रेसचा घोडा बनवायची तयारी सुरु होते. आता मुलाने बोलायला सुरुवात केली की थेट E =MC square म्हणायचं बाकी राहिलं आहे.
संकलन……✍️👇
शिवश्री गोरख मोरजकर
शिक्षण तज्ञ