राजकारण खरचं गजकरण झाले आहे का?

महेंद्र कुंभारे,

           कधी नव्हे इतकी खालची पातळी राजकारणाने गाठली असल्याचे सध्याच्या चालू घडामोडींवरुन लक्षात येते. २०१४ नंतर स्वातंत्र्य मिळाले असे भाजप म्हणते, मग ते स्वातंत्र्य नेमके कोणाला मिळाले? मग इतकी वर्ष आपण पारतंत्र्यात होतो का? सत्ताधारी भाजपच्याच एका राज्यपालाने पुलवामाचा भांडाफोड केला. राज्य मिळविण्यासाठी तुम्ही आपल्याच जवानांचा बळी घेतला हे यातून सिध्द झाले. किती निच आणि खालच्या पातळीचे राजकारण केले. फक्त सत्तेसाठी? बिचाऱ्या जवानांच्या कुटुंबियांचा साधा विचारही तुमच्या मनात आला नाही का? सत्तेच्या खुर्चीच्या महत्वेकांक्षेसाठी तुम्ही आपल्या जवानांच्याच जीवावर उठले? इतका मोठा ट्रक आणि तो ही स्फोटकांनी भरलेला थेट जवानांमध्ये घुसुन स्फोट घडवून आणतो. त्याचा अजूनही तुम्हाला थांगपत्ता लागत नाही?  मग तुम्ही कसले विश्वगुरु? तुम्ही तर गुरू म्हणण्याच्या लायकीचेही नाहीत. राज्यपालांनी गुपित फोडल्यानंतर जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी त्या अतिक आणि त्याच्या भावाचे हत्याकांड घडवून आणले. पण, यांचे नशीबच खराब म्हणून महाराष्ट्र भूषण पुरस्काराला गालबोट लागले. आणि आतिक हत्याकांड बाजूला झाले. नवी मुंबई खारघरची घटना घडली नसती, तर आतिकच्या आडून भाजपचेच पिल्लू MIM आक्रमक होऊन दंगली घडविल्या गेल्या असत्या. नाहीतरी येत्या काळात वर्षभराच्या आत देशात जाती दंगली भडकणारच. कारण, यावरच यांचे राजकारण अवलंबून आहे. शिवाय इतके दिवस गप्प असलेले चिन आणि पाकिस्तानही येत्या काळात डोके वर काढणार हे नक्की. 

           संपूर्ण देशात भाजप विरोधी भयंकर असंतोष आहे. त्यात सर्व विरोधीपक्ष आपापसातील हेवेदावे विसरून, विरोधी विचारसरणी असूनही एकत्र येत आहेत. ही भाजपसाठी धोक्याची घंटा असून त्यांचा सुपडासाफ होऊ शकतो. तसे सर्व्हेचे आकडेही सांगतात. म्हणूनच देशात आता "लोकतंत्र खतरे मे है" असा अपप्रचार भाजपकडून सुरु होईल. त्यातच भारताला हिंदु राष्ट्र घोषित करण्यासाठी आम्हाला निवडून द्या असा प्रचारही भाजपकडून होऊ शकतो. नाहीतरी देशात प्रत्येक व्यक्ती भारतीय नसून आपापल्या जाती, धर्म, पंथाचा धर्मवेडा आहे. १० वर्ष भाजपच्या हाती केंद्रात आणि जास्तीतजास्त राज्यात सत्ता असूनही आजपर्यंत हिंदु राष्ट्र घोषित करु शकले नाही. कारण, हिंदु राष्ट्र म्हणजे नेमके काय? हेच अजून कोणाला माहित नाही. नेमकी त्याची व्याख्या आणि संकल्पना काय? हिंदू राष्ट्र म्हणजे चातुर्वर्ण्य पध्दत आहे का? ब्राम्हण, क्षत्रिय, वैश्य आणि शुद्र म्हणजे हिंदू राष्ट्र आहे का? तसे असेल तर आपण कोणत्या वर्णात बसतो याचा प्रत्येकाने खास करुन अंधभक्तांनी विचार करण्याची वेळ आता आली आहे. 

           महाराष्ट्र भूषण पुरस्कार देताना जी भयानक दुर्घटना घडली याला जबाबदार कोण? स्वतःच्या स्वार्थासाठी दासांच्या अनुयायांना भर उन्हात बसविण्याचे षडयंत्र कुणाचे? या खुनाचे (हो हे खुनच आहे) प्रायश्चित घ्यायचे असेल तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी केंद्रिय गृहमंत्र्यांना सोबत घेऊन कोणतेही सुरक्षा कवच न घेता, उपाशी तापाशी याच भर उन्हात सकाळी ८ ते २ त्याच मैदानात उभे रहावे. तेंव्हाच समजेल उन्हाचा चटका लागून उष्माघात कसा होतो. मतांचे राजकारण करण्यासाठी जनतेला वेठीस धरणे कितपत योग्य आहे. समाजा समाजात तेढ निर्माण करुन आपली राजकीय पोळी भाजून घेण्याचे नीच आणि घाणेरडे राजकारण सध्या सुरु आहे. राजकारणाने निच्चतम पातळी गाठली आहे. सत्तेचा गैरवापर करुन विरोधीपक्षाच्या नेत्यांना विनाकारण तुरुंगात डांबले जात आहे. असे राजकारण देशाच्या हिताचे नसून भारताची वाटचाल विनाशाकडे सुरु आहे. या गजकरणावर वेळीच इलाज न केल्यास हा रोग संपूर्ण देश खाऊन टाकेल. यातून वेळीच जनतेने बोध न घेतल्यास भविष्य खराब होणार हे नक्की. तूर्तास इतकेच

अस्वीकरण – लेखकाचे व्यक्तिगत मत आहे

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top