पालकांनी नको त्या अपेक्षा करू नये……..
आपल्याकडे मुलांच्या मानसिकतेचा विचार केला जात नाही, मित्राचा मुलगा एमबीबीएस गेला म्हणजे माझाही एम बी बी एस लाच गेला पाहिजे असा पालकांचा अट्टाहास असतो त्याठिकाणी आपल्या मुलाला कोणत क्षेत्र आवडत त्याचा विचार केला जात नाही त्यामुळे मुले इच्छा नसताना पालकांच्या हट्टामुळे नको असलेले क्षेत्र निवडतात व पुढे निराश होताना दिसतात.
आपण जर जर्मनीसारख्या देशाचा विचार केला तर जर्मनीमध्ये मुलांना Transference शिक्षण दिले जाते. लहान मुलांची बोटे नाजूक असतात हे लक्षात घेऊन दुसरीपर्यंत लेखन करू देत नाहीत. पाचवीपर्यंत practical चालतं आणि त्यानंतर विद्यार्थी बँक कर्मचारी बनेल की हवाई सेविका, प्रशासन सांभाळेल की कुशल कामगार होईल, तो कोणत्या क्षेत्रात यशस्वी होऊ शकतो ह्याची सतत तपासणी होते. दहावीनंतर फक्त त्याला आवडणाऱ्या क्षेत्राचं प्रशिक्षण दिले जाते. सगळे एकदम science मध्ये भरत नाहीत. अनावश्यक विषय शिकवत नाहीत. चीन हा cycle प्रेमी देश ४ वर्षाच्या मुलांना cycle चालवण्याचं शिक्षण देतो. त्यानंतर theory कमी आणि प्रत्यक्ष कृती शिकवतात.
प्रत्येक विद्यार्थी उद्या देश चालवणार ह्याचा विचार Netherlands सारखा देशही करतो. एकाच विद्यार्थ्यावर सगळ्या विषयांचा मारा करत नाहीत. चारी दिशांनी अनेक विषय आणि क्लासचा मारा सोसण्याचे काम फक्त भारतीय विद्यार्थ्यांना करावे लागते.
संकलन……✍️👇
शिवश्री गोरख मोरजकर
शिक्षण तज्ञ