विद्यार्थ्याचा कल पाहूनच अभ्यासक्रम निवडावा….

गरज पाल्य-पालक संवादाची व समन्वयाची…
भाग :-७

👉 इयत्ता १० वीच्या निकालानंतर कुठली शाखा निवडावी, यामध्येदेखील पालक व मुलांमध्ये एकमत असावे. विद्यार्थ्याच्या आवडीनिवडी, व्यक्तिमत्त्व, कार्यक्षमता, त्याच्यामधील प्रॅक्टिकल इंटेलिजन्स, अभ्यासक्रमाची उपयुक्तता अशा अनेक गोष्टींचा सारासार विचार करूनच शाखा निवडावी. करिअर कौन्सेलरची मदतही वेळप्रसंगी जरूर घ्यावी. शिक्षणानंतर कुठले काम करायला त्याला आवडेल, याचाही जरूर विचार व्हावा.
👉 आपला पाल्य युनिक म्हणजेच एकमेवद्वितीय आहे, हे पालकांनी लक्षात घ्यावे. त्यामुळे इतरांशी त्याची तुलना करणे टाळावे. त्याच्या व्यक्तिमत्त्वाला पैलू पाडण्यासाठी तुम्ही त्याचे मित्र व मेंटॉर(समउपदेशक) किंवा मार्गदर्शक बनणे अपेक्षित आहे. आपण मुलाचे पालक आहोत मालक नाही, याचे भान ठेवावे.
मला खात्री आहे, की वरील टिप्स पालक व मुलांमधील संवाद वाढण्यास नक्कीच उपयुक्त ठरतील. त्यामुळे साहजिकच दोघांचे नाते दृढ व सक्षम होईल.

संकलन……✍️👇

शिवश्री गोरख मोरजकर

शिक्षणतज्ञ

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top