शिंदे गटात थांबायचे कि शिवसेना स्वगृही परतायचे
महाराष्ट्राच्या सत्ताकारणातील विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर महाविकास आघाडी सरकार कोसळले. शिंदे गट आणि भाजपाचे सरकार सत्तेत आले परंतु हे सरकार महाराष्ट्रात स्थिर होईल असे चिन्ह दिसत नाहीत कारण एक महिना होतो आहे तरी मंत्रिमंडळ स्थापन झाले नाही तसेच शिंदे गटातील आमदारावर सुप्रीम कोर्टाच्या निकालाची टांगती तलवार या दोन्ही बाबी मुळे शिंदे गटातील बंडखोर आमदाराचे राजकीय भवितव्य धूसर होत चालले आहे…

www.janvicharnews.com
शिंदे बंडखोर आमदारापुढे एक पेच निर्माण झाला तो म्हणजे शिंदे गटात थांबायचे कि शिवसेना स्वगृही परतायचे?
कारणे…..
१ गेल्या महिन्याभरापासून राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार रखडलेला आहे..कधी होईल याची स्पष्टता नाही
2 १ ऑगस्ट रोजी सुप्रीम कोर्टाचा निकाल कोणाच्या बाजूने लागेल? १ ऑगस्टच्या सर्वोच्च सुनावणीन धाकधूक.. निकाल कोणाच्याही बाजूने लागला तरी आपले भविष्य काय?
3 अर्जुन खोतकर सारखा नेता हि आपली भूमिका स्पष्टपणे जाहीर करीत नाहीत..
४ संजय राउत म्हणतात शिंदे गटातील काही आमदार स्वगृही परतण्यास इच्छुक आहेत
५.सत्तेत वाटा असेल का? ईडीचे संकट टळेल का? सुप्रीम कोर्टाच्या निकालाची धाकधूक? पुढील राजकीय भविष्य काय असणार या संभ्रमात…
६शिंदे गटात राहून आपल्याला काय मिळेल तसेच उद्धव ठाकरेकडे गेलो तर काय होईल..कोण कधी रंग बदलेल याची चिंता सतत बंडखोर आमदारांना सतावत आहे..
७ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मंत्रिमंडळ विस्ताराचे स्वातंत्र्य नाही हे दोघे हि दिल्लीच्या आदेशाची वाट पाहत आहेत…
८ शिंदे गटाची आणि भाजपा आमदाराची सारी सूत्रे अमित शहा यांच्या हाती आहेत त्यांच्या कलाने सर्व निर्णय घेतले जातील अशी विद्यमान परिस्थिती आहे ..
९ समजा सुप्रीम कोर्टाचा निकाल शिंदे गटाच्या बाजूने लागला तरी शिंदे गटातील कोणाची वर्णी मंत्रिमंडळात लागेल याचे सर्व अधिकार केंद्रीय भाजपाकडे असतील..

शिंदे गट आणि उद्धव ठाकरे www.janvicharnews.com
१० भाजपाने शिंदेच्या माध्यमातून शिवसेना फोडली अशी चर्चा आहे तरी उद्या शिंदे गट फोडण्यास भाजपाला सहज शक्य आहे कारण सर्व अधिकाराचा चेंडू भाजपच्या कोर्टात आहे
११ भाजपा योग्य वेळ येताच शिंदेचा पाठींबा काढून घेऊन निवडणुकीस सामोरे जाण्यास तयार होईल त्यावेळी शिंदे गटातील आमदारांचे भवितव्य काय असणार आहे?
१२ समजा सुप्रीम कोर्टाचा निकाल शिंदे गटाच्या विरोधात गेला आणि सरकार कोसळले तर पुढील राजकीय वाटचाल काय असणार याची चिंता शिंदे गटातील आमदारांना सतावत आहे…