संगती आणि पुस्तके जीवनाला आकार देतात!
चांगल्या माणसांची संगत असेल आणि चांगली पुस्तके वाचुन त्याचा आपल्या आयुष्यात प्रामाणिकपणे अंगिकार केला तर आपल्याला :
www.janvicharnews.com
- 1.बंदुकीपेक्षा शब्द जास्त तीक्ष्ण असतात हे समजते.
- 2.मी केलं, मी केलं हे म्हणणे किती खोटं आहे हे लक्षात येतं.
- 3. काय आणि कुठे बोलावे आणि कुठे बोलु नये हे कळते.
- 4.एखाद्याची चुक झाल्यावर त्याला माफ करण्याची ताकद येते.
- 5.जीवन जगण्याची नवी उमेद,एक ऊर्जा निर्माण होते.
- 6. मला कोणीच मदत केली नाही. मीच सर्व कांही केले हा मिथ्या अहंभाव कमी होतो.
- 7. घटस्फोट, जवळच्या व्यक्तीचे मरण म्हणजे आपले जीवन संपले हा गैरसमज दुर होतो.
- 8.आयुष्याच्या प्रति संवेदनशील भावना निर्माण होते.
- 9.एकमेकांच्या सुख:दुःखाची तीव्रता कळते.
- 10. आपण बाळगत असलेला फुशारकीचा आव नाहीसा होतो.
- 11. भिकारी पण माणुस दिसायला लागतो.
- 12. चोरामध्ये चोरी करण्याची मजबुरी दिसायला लागते.
- 13. आयुष्य सुंदर जगण्यासाठी संघर्ष करण्याची प्रेरणा मिळते
- 14. प्राण्यांबद्दल आपुलकी वाटायला लागते.
- 15. खुश आहोत असं दाखवणारे लोक , खऱ्या आयुष्यात किती दुःखी आहेत हे समजते.
- 16. जवळ असणाऱ्या चुकीच्या माणसाची नाटके समजतात .
- 17.चांगल्या लोकांचे अनुकरण करून चांगले होता येते तर वाईट लोकांचे अनुकरण करून वाईटच होते हे समजते.
- 18. प्रोत्साहनामुळे हरलेली व्यक्ति जिंकु शकते, हे समजते.
- 19. हारल्यावर किंवा नापास झाल्यावर आत्महत्येचा विचार पण मनात येत नाही.
- 20. करोडोची संपत्ती असणाऱ्यात गरीब तसेच गरीबातील श्रीमंती दिसायला लागते.
- 21.दुसऱ्यांचे चांगले झालेले पाहुन मत्सर करण्यापेक्षा त्याच्यातुन प्रेरणा घेऊन आपली प्रगती करण्याचा उत्साह दुणावतो.

www.janvicharnews.com
चला तर मग आयुष्य सुंदर आणि सक्षम करण्यासाठी जसं होईल तसं वेळ काढून पुस्तकं वाचूया.चांगले विचार ऐकु या . तसेच चांगली संगत ठेवुन आपलं जीवन अर्थपूर्ण आणि समृद्ध करण्यासाठी प्रत्येक पाऊल उचलु या.