
www.janvicharnews.com
१) मदत करणाऱ्याला कधीच धोका देवू नका, आणि धोका देणाऱ्याला कधीच मदत करू नका.
२) मुलगा आई-वडिलांपेक्षा जास्त कमवायला लागला की तो पैशापुढे हे आपले आई वडील आहेत हे विसरलेला असतो.
३) आयुष्यात कितीही मोठे बना ; पण माणुसकी सोडू नका.
४) “मदत” एक अशी गोष्ट आहे की केली तर लोक लगेच विसरतात आणि नाही केली तर कायम लक्षात ठेवतात.
५) रात्री शांत झोप येणे सहज गोष्ट नाही ; त्यासाठी संपूर्ण दिवस प्रामाणिक असावे लागते.
६) पायाला झालेली जखम जपून चालायला शिकवते ; आणि मनाला झालेली जखम आयुष्य जगायला शिकवते.
७) लहानपणी वाटायचे, परीक्षा फक्त शाळेतच असतात ; आज समजलं, आयुष्य जगताना खूप परीक्षा द्याव्या लागतात.
८) वाईट दिवस अनुभवल्या शिवाय चांगल्या दिवसांची किंमत कळत नाही.
९) लोखंडाने सोन्याचे कितीही तुकडे केले तरी सोन्याची किंमत कमी होत नाही.
१०) घर किती मोठं आहे याला महत्त्व नसून घरात 🏠 किती सुख आहे हे खूप महत्त्वाचे आहे.
११) आपल्यामधील विश्र्वास पर्वतालाही हलवू शकतो ; परंतु आपल्यामधील शंका आपल्यासमोर पर्वत उभा करू शकतो.
१२) गोड बोलण्याचे सोंग करणारा माणूस कधीच कोणाचा हितचिंतक नसतो.
१३) कुत्र्याचे सारे गुण माणसांनी घेतले ; पण इमानदारी नाही घेतली.
१४) स्त्रीच्या गर्भातून जन्म घेवून त्यानेच पाटी लिहिली, “स्त्रियांना येथे प्रवेश नाही”. कमाल आहे माणसा तुझी….
१५) ज्या दिवशी भारतीय नागरिक ‘पान’,तांबाखू आणि ‘खुटखा’ खायचे बंद करतील त्या दिवशी भारत सर्वात स्वच्छ देश
होईल.आपलेच लोक स्वतःवर थुंकणे बंद करतील ,देश आपोआप स्वच्छ होईल*
आजचा दिवस आनंदात जावो.