जगताप बाळकृष्ण -(वेलनेस कोच )
janvicharnews.com
प्रत्येक मनुष्य दिवसाच्या २४ तासांपैकी ६ ते ८ तास झोपतो. म्हणजे तो आपला २५ ते ३०% काळ झोपलेला असतो. त्यामुळे झोपेच्या काळात शरीराची चुकीची अवस्था असली, तर शरीरामध्ये रोगांना व विकृतींना स्थान मिळते. गुजरातमधील पंचमहाल जिल्ह्यातील देलोल गावी राहणाऱ्या श्री. रामजीभाई कनोजिया यांनी झोपणे, चालणे व बसणे या तीन क्रियांवर संशोधन करून शरीर संतुलन चिकित्सा या नवीन पद्धतीचा शोध लावला. त्यांच्या म्हणण्यानुसार मनुष्य शरीराच्या ४५ स्थितींमध्ये झोपतो. त्यांपैकी ४२ स्थितींमुळे शरीराला अपाय होतात. पुढील फक्त तीन स्थितींमुळे शरीराला अपाय होत नाहीत : डाव्या अथवा उजव्या कुशीवर झोपणे. त्या वेळी एक हात वाकवून जमिनीवर ठेवणे व दुसरा हात मांडीवर ठेवणे. तसेच जमिनीला पाठ लावून उताणे झोपणे. यांत हात पोटावर बेंबीखाली वा जमिनीवर शरीराला समांतर असे ठेवावेत तसेच प्रत्येकाने झोप म्हणजे काय व ती का येते याचा विचार केला पाहिजे. तज्ज्ञांच्या मतानुसार अन्नाच्या पचनानंतर अॅमिनो अॅसिडस्/ आम्ले तयार होतात व रक्तात मिसळतात. त्यांचे प्रमाण विशिष्ट मर्यादेच्या वर गेले की मेंदूला ग्लानी येते व पुढे झोप येते.
janvicharnews.com
झोपेबद्दल अधिक माहिती
१.झोपण्याची वेळ कायम ठेवावी (उदा. रात्री १० ते पहाटे ४ किंवा ११ ते ५)
कमाल ६ तास.
२.रात्री हलके जेवण घ्यावे, जड जेवणाने अपचन होते व स्वप्ने पडतात. ३. जेवणानंतर दोन-तीन तास झोपू नये. पचनाला हा वेळ आवश्यक असतो.
४. दुपारी झोपू नये, यामुळे चरबी किंवा मेद वाढतो.
५.झोपेत जाग आल्यास, उठून पाणी प्यावे; लघवी करावी.
६.गाढ झोप आरोग्याला आवश्यक असते. तो ताजेतवाने करणारा विस्मरणकाळ असतो.
७.जाग्रणाने उष्णता वाढते. शरीराला अपाय होतात. एक रात्र झोप आली नाही तर त्याचे दुष्परिणाम पुढील सात दिवस होत राहतात.
८.झोपेच्या काळात, शरीराची दिवसभरात झालेली झीज भरून निघते व शरीराची वाढ होते. तसेच या काळात शरीरावर झालेल्या जखमा भरून येतात.
९. दुर्बल व कृश व्यक्तींनी बलवान होण्यासाठी, स्निग्ध आहाराबरोबरच भरपूर झोप घ्यावी.
१०.माणसाचे सुख व दुःख, पुष्टी व कृशता, बल व दुर्बलता हे सारे झोपेच्या आधीन आहे.
११.माणसाची सुखाची इच्छा पूर्ण होण्यासाठी (१) अकाली झोपणे,(२) अधिक झोपणे, व (३) मुळीच न झोपणे यांचा त्याने त्याग करावा.
१२.दिवस कामासाठी व रात्र झोपेसाठी हा निसर्गनियम पशुपक्ष्यांप्रमाणे माणसालाही लागू आहे.
१३.झोपेचा काळ श्रमांवर अवलंबून असतो; जास्त श्रम करणाऱ्यांना जास्त झोपेची गरज असते.
१४.वयानुसार झोप कमी होत जाते. अर्भके २२-२३ तास झोपतात. तारुण्यावस्था पूर्ण होईपर्यंत, शरीराच्या वाढीच्या काळात थोडी जास्त, म्हणजे ८ ते ९ तास झोप लागते व प्रौढपणी ही झोप ६-७ तास पुरते. तर वृद्धावस्थेत फक्त ४-५ तास झोप पुरते.
!!हे ईश्वरा सर्वांच आरोग्य चांगलं ठेव!!
सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे संतु निरामया|
सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चिद दुःख भागभवेत्||
दवा ना खाना
*सही समय पर सही खाना, खाना….
janvicharnews.com
झोपताना घ्यावयाची काळजी
१. हात, पाय, तोंड इ. धुवून घ्यावे, त्यामुळे शरीराला थंडावा मिळतो. २. पोटावर पालथे झोपू नये.
३. उघडे झोपू नये, अंगावर घाम शोषणारे व ढिले कपडे असावेत.
४. उंचावर झोपावे, डास, ढेकूण, पाल इ. चावू नयेत. आवश्यक तर मच्छरदाणी वापरावी.
५.लघवी, शौच आटोपून मगच झोपावे.
६.एक-दोन भांडी पाणी प्यावे; ते पचनासाठी आवश्यक असते. ७. अंगाखाली सपाट फळी/पुठ्ठा/चादर असावी; मऊ व जाड गादी नसावी. यामुळे पाठीच्या विकारांपासून दूर रहाता येते.
८.अंगावर पातळ पांघरूण असावे. पंख्याचा जोराचा वारा घेऊ नये.
९.पूर्वेला डोके करून झोपावे. त्यामुळे शरीराला नैसर्गिकरीत्या चुंबकशक्ती मिळते.
१०.मानेखाली उशी घेऊ नये. त्यामुळे मेंदूला पुरेसा रक्तपुरवठा होऊ शकतो..
११.झोपताना व उठल्यावर पाच मिनिटे प्रार्थना करावी. यामुळे मनोबल वाढते.
जास्त झोपेचे परिणाम
१.सुस्ती किंवा आळस येतो. चपळता कमी होते. २. मेद किंवा चरबी वाढते. परिणामी, वजन वाढते. पोट सुटते.
३.हालचाली किंवा श्रम कमी झाल्याने व पोट सुटल्याने शरीर बेढब बनते, बोजड बनते. ४.झोप जास्त घेतली तर ती आणखीनच वाढत जाते. आपणहून कधी कमी होत नाही व वेळेचा अपव्यय होतो.
५.परिणामी, मन कमकुवत बनते, दुर्बल होते व माणसाचे कायमचे नुकसान होते.
झोप कमी कशी करावी?
१.रात्री थोडेसे कमी जेवावे व तेही पचायला हलके जेवण असावे. जड पदार्थ (उदा. मटण, चिकन इ.) खाल्ल्यास पचायला वेळ जास्त लागतो व झोप जास्त येते, म्हणून रात्री जड अन्न टाळावे.
२.झोपण्यापूर्वी दोन ते तीन तास अगोदर जेवावे. अन्नपचनासाठी लागणाऱ्या दोन-तीन तास या वेळामध्ये शरीराच्या हालचाली होतात व ते अन्न जठरातून खाली आतड्यामध्ये जाते.
३. दीर्घश्वसन केल्यामुळे ॲमिनो ॲसिडसारखी विषारी द्रव्ये जळून जातात