डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा मानवमुक्तीचा लढा
डॉ.बाबासाहेब आंबेडकर या युगप्रवर्तक महापुरुषाच्या संपूर्ण जीवन प्रवासाचा आपण वस्तुनिष्ठ व चिकित्सकपणे अभ्यास केला तर आपणास असे निदर्शनास येते की, या महामानवाने आपल्या जीवनातील संपूर्ण कार्य हे भारत देशातील शोषित- वंचित जनांसाठी खर्ची घातलेली आहे. ज्यात त्यांनी विशिष्ट अशा एका वर्गापुरते कार्य न करता तत्कालीन काळातील सर्वच जाती धर्म समूहातील लोकांच्या न्याय, हक्कासाठी एत्तद्देशीय राजकारणी व ब्रिटिशांशी संघर्ष करून या घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अतोनात प्रयत्न केलेले दिसतात.